मुंबई : रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्यावर गृहखात्याने कारवाई करावी, या मागणीसाठी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आज राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली. त्यावेळी या प्रकरणाची कायदेशीर माहिती घेऊन कारवाई केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. मात्र, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे प्रकरणात गुन्हा का दाखल झाला नाही, याबाबत मात्र त्यांनी बोलण्याचे टाळले.
अर्णब गोस्वामी व बार्कचे माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअॅप चॅट प्रसारमाध्यमांवर व्हायरल झालं. या चॅटमधून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. गोस्वामी-दासगुप्ता यांच्यातील चॅटवर एनबीएने आश्चर्य व्यक्त केलं आहे. चॅटसंदर्भात सविस्तर पत्रक एनबीएकडून प्रसिद्ध करण्यात आलं असून, रिपब्लिक वृत्तवाहिन्यांवर कारवाई करण्याच्या मागणीवर जोर देण्यात आला आहे. त्याचबरोबर वृत्तवाहिन्यांचं रेटिंग निश्चित करणाऱ्या ‘बार्क’च्या कार्यावर देखील ताशेरे ओढले आहेत.
रिपब्लिक माध्यम समूहाचे संपादक अर्णव गोस्वामी यांना बालाकोट अन् पुलवामा या संवेदनशील विषयांची माहिती कशी होती, याची चौकशी केली जाणार आहे, असे काल देशमुख यांनी सांगितले होते. आज काँग्रेस शिष्टमंडळाच्या भेटीनंतर ते म्हणाले, "ही अतिशय गंभीर बाब आहे. त्याची दखल घेतली जाईल. यांना पाठीशी केंद्र सरकार टाकत आहे का ? असा सवाल आहे. या संपूर्ण प्रकरण लिगल माहिती घेऊन राज्य सरकार कारवाई करेल. लिगल माहिती घेत कारवाई करता येते का ही माहिती घेऊ,''
धनंजय मुंडे प्रकरणात गुन्हा का दाखल होत नाही यावर मात्र गृहमंत्र्यांनी बोलायचे टाळले. भंडारा प्रकरणात विभागीय आयुक्त चौकशी रिपोर्ट सादर केला असून त्यात काय नेमके म्हटले यावर कारवाई नियमानुसार केली जाईल, असे ते म्हणाले.
Edited By - Amit Golwalkar
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.