मुंबई : शेतकऱ्यांची वीज बिले थकित असली तरीही जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापले जाणार नाही, अशी ग्वाही अजित पवार यांनी आज दिली. भाजप आमदार आशिष शेलार यांनी याची माहिती दिली.
शेतकऱ्यांचा प्रश्न महत्वाचा आहे. त्यामुळे प्रश्नोतराच्या आधी शेतकरी वीजबिल प्रशानवरती चर्चा सुरू करण्यात यावी, अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. त्यावर अजित पवार यांनी ही ग्वाही दिली. दुसरीकडे आज सत्ताधारी पक्षाने सभागृहात बॅनरबाजी केली. पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅस वाढ वरून केंद्र सरकारचा निषेध, अशा प्रकारचे बॅनर त्यांनी सभागृहात फडकवले.
याबाबत माहिती देताना शेलार म्हणाले, "राज्यात वीज कनेक्शन कट करण्यासंदर्भात मोठ काम राज्यात सुरू आहे. ६५ लाख वीज कनेक्शन कापलं जाणार आहे. यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्न उपस्थित केला. अजित पवार यांनी तातडीने उत्तर दिले. सभागृहात संपूर्ण चर्चा होई पर्यंत वीज कनेक्शन कट केले जाणार नाही,''
Edited By - Amit Golwalkar
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.