2019 च्या पोलिस भरतीसाठी मराठा तरुणांना खुल्या प्रवर्गातून अर्ज करण्याची सूचना

मराठा समाजात असंतोष निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
 Uddhav Thackeray
Uddhav Thackeray

मुंबई : राज्यातील पोलीस भरतीची प्रक्रिया पार पाडण्यासठी मराठा समाजाच्या एसईबीसी (सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास) प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी गृहविभागाने आज आदेश काढत त्यांना खुल्या वर्गातून पुन्हा अर्ज करण्यास सांगितले आहे. 

जीआरनुसार 'एसईबीसी'तून अर्ज केलेल्या उमेदवारांची पात्रता ठरविताना खुल्या प्रवर्गाची वयोमर्यादा लागू केली जाणार आहे. जे उमेदवार खुल्या प्रवर्गातील अटी व शर्तींची पूर्तता करतात, त्यांचा खुल्या प्रवर्गातून विचार केला जाणार आहे. 'एसईबीसी'तून अर्ज केलेल्यांना खुल्या प्रवर्गाचे परीक्षा शुल्क आकारले जाणार. 

वाढीव परीक्षा शुल्क ऑनलाइन पद्धतीने 15 दिवसांत भरावे लागणार आहे. याबाबत पोलिस महासंचालकांनी या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करुन शासनाला अहवाल सादर करण्याच्या सूचना सरकारने केल्या आहेत.

गृह विभागाने 2019 मध्ये पोलिस भरतीचा निर्णय घेतला आणि त्यानुसार जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती, मात्र 9 सप्टेंबर 2020 रोजी सर्वोच्च न्यायालयाने 'एसईबीसी' आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिल्याने पोलिस भरती प्रक्रिया थांबविण्यात आली होती. मात्र, गृह विभागाने पोलिस भरतीच्या दृष्टीने आदेश काढले आहेत. त्यामुळे 

मराठा समाजात असंतोष निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 

मराठा संघटनानंनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे राज्य सरकारला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पुढे ढकलावी लागली होती. 25 जानेवारीला मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यापूर्वीच राज्याच्या गृह विभागाने नवा आदेश काढल्याने मराठा संघटना काय भूमिका घेतात हे पाहावे लागणार आहे.

शासनाने काढलेला जीआर अन्यायकारक

पोलिस भरती प्रक्रियेत ज्या मराठा समाजातील उमेदवारांनी एसईबीसी प्रवर्गातून अर्ज केला आहे. त्यांनी खुल्या वर्गातून आवश्यक सुधारणेसह अर्ज करावा या संदर्भात शासनाने काढलेला जी आर अन्यायकारक आहे, असा आरोप मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक धनंजय जाधव यांनी केला. 

असा जीआर काढून सरकार मराठा समाजावर अन्याय करत आहे. राज्य सरकारला मराठा समाजाच्या विरोधातील निर्णय घेणे महागात पडेल, असा इशाराही जाधव यांनी दिला आहे.

जातीजातीत तेढ निर्माण करण्याचे काम शासन करत आहे.  २५ जानेवारी पर्यंत जर हे थांबू शकत नसतील तर मराठा समाज आक्रमक होऊन उत्तर देईल. त्यामुळे राज्यात जे वातावरण गढूळ होईल. त्याला सरकार जबाबदार असेल, असेही आव्हान जाधव यांनी दिले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com