आरोपपत्राविरोधात अर्णब गोस्वामींचा अर्ज

वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अलिबाग पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्राविरोधात रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांनी मुंबई उच्च न्यायालयात नवा अर्ज दाखल केला आहे. या आरोपपत्राची दखल अलिबाग न्यायालयाने घेऊ नये, अशी मागणी त्यांनी केली आहे.
Arnab Goswami
Arnab Goswami

मुंबई  : वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अलिबाग पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्राविरोधात रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांनी मुंबई उच्च न्यायालयात नवा अर्ज दाखल केला आहे. या आरोपपत्राची दखल अलिबाग न्यायालयाने घेऊ नये, अशी मागणी त्यांनी केली आहे.

नाईक आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी गुरुवारी गोस्वामी यांच्यासह कंत्राटदार फिरोज शेख आणि नितेश सारडा यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. त्याआधी गोस्वामी यांनी या प्रकरणाच्या तपासाला स्थगिती द्यावी आणि तपास सीबीआयकडे वर्ग करावा, अशी मागणी दोन स्वतंत्र अर्जाद्वारे केली आहे; मात्र पोलिसांनी दाखल केलेल्या अर्जामुळे गोस्वामी यांनी पुन्हा नवीन अर्ज केला. 

अलिबाग न्यायालयाने या अर्जाची दखल घेऊ नये आणि संपूर्ण तपासाला स्थगिती द्यावी, अशी मागणी याचिकेत केली आहे. न्यायालयाच्या परवानगीशिवाय हा तपास सुरू झाला आहे, असा दावा गोस्वामी यांनी केला आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या १९१४ पानी आरोपपत्रात एकूण ६५ साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत. कायदेशीर प्रक्रियेनुसार आरोपपत्र आता अलिबाग सत्र न्यायालयाकडे सोपवले जाईल. त्यानंतर खटल्याची कारवाई सुरू होऊ शकेल; मात्र गोस्वामी यांच्या अर्जावर उच्च न्यायालयात पुढील आठवड्यात तातडीने सुनावणी होण्याची शक्‍यता आहे.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com