प्रताप सरनाईकांना ईडी उद्या बोलावणार?

आमदार सरनाईक यांना चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजावले होते. मात्र, सरनाईक हे चौकशीसाठी हजर झाले नाहीत. त्या ऐवजी ते क्वारंटाईन झाले. हा कालावधी उद्या संपतो आहे. दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार, शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचा मुलगा विहंग सरनाईक याला ईडीकडून तीन वेळा समन्स बजावण्यात आले. मात्र तो उपस्थित राहिला नाही
ED May Call Pratap Sarnaik For Inquiry anytime
ED May Call Pratap Sarnaik For Inquiry anytime

मुंबई : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांचा क्वारंटाईनचा काळ उद्या (बुधवारी) संपत आहे. त्यांना कुठल्याही वेळेला ईडीकडून चौकशीसाठी बोलावले जाण्याची शक्यता आहे. आमदार सरनाईक यांचे मुंबई तसेच ठाणे येथील कार्यालये आणि घरावर ईडीने २४ नोव्हेंबरला छापा टाकत कारवाई केली होती.  त्यानंतर ईडीने विहंग सरनाईक यांची चौकशी सुरू केली होती. 

ईडीने आमदार सरनाईक यांना चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजावले होते. मात्र, सरनाईक हे चौकशीसाठी हजर झाले नाहीत. त्या ऐवजी ते क्वारंटाईन झाले. हा कालावधी उद्या संपतो आहे. दरम्यान,  सूत्रांच्या माहितीनुसार, शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचा मुलगा विहंग सरनाईक याला ईडीकडून तीन वेळा समन्स बजावण्यात आले. मात्र तो उपस्थित राहिला नाही. त्यालाही सरनाईक यांच्याबरोबर बोलावले जाण्याची शक्यता आहे. 

टॉप्स ग्रुपप्रकरणी तपास करणाऱ्या सक्तवसुली संचालनालय (ईडी) अटक केलेले अमित चांदोळे यांना न्यायालयाने रविवारी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. चांदोळे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचे निकटवर्तीय मानले जातात. लंडन येथील मालमत्तांप्रकरणी ईडीने चांदोळे यांची १२ तास चौकशी केल्यानंतर २५ नोव्हेंबरला मनी लॉंडरिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए) कलम ३ व ४ अंतर्गत त्यांना अटक केली होती. याप्रकरणी रविवारी न्यायालयाने त्यांना ९ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. 

टॉप्स ग्रुपला मिळालेल्या एमएमआरडीएच्या कंत्राटात गैरव्यवहार करून त्यातील दरमहा सहा लाख रुपये त्यांना मिळत असल्याचा आरोप आहे. याप्रकरणी ईडीने मुंबई व ठाण्यातील १० ठिकाणी शोधमोहीम राबवली होती. त्यात चांदोळेच्या ठिकाणाचाही सहभाग होता. याप्रकरणी ईडीच्या रडारवर आलेल्या व्यावसायिक देवाण-घेवाणीबाबतची माहिती चांदोळेला असल्याचा संशय आहे. या प्रकरणी रमेश नायर यांच्या तक्रारीवरून यलो गेट पोलिस ठाण्यात टॉप्स ग्रुपचे संस्थापक राहुल नंदा यांच्यासह आठ जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

१७५  कोटी रुपयांच्या कथित गैरव्यवहार प्रकरण नुकतेच तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेला वर्ग करण्यात आले आहे. त्यातही मॉरिशस येथील ट्रस्टबद्दल नायर यांनी आरोप केला होता. मनी लॉंडरिंग आरोपावरून ईडीने याप्रकरणी तपासाला सुरुवात केली होती. दरम्यान, तक्रारीत करण्यात आलेले आरोप नंदा यांनी फेटाळून लावले होते. या वेळी २००९ मध्ये ईडीने लंडनमधील व्यवहाराबाबत आम्हाला यापूर्वी विचारणा केली होती. त्या वेळी कागदोपत्री पुराव्यांसह व्यवहार पूर्णपणे कायदेशीर असल्याचे दाखवून दिले होते. तसेच मॉरिशस येथील ट्रस्टबाबतही यापूर्वी विचारण्यात आले होते. तो ट्रस्टही वकिलांच्या मदतीने पूर्णपणे कायदेशीर पद्धतीने स्थापन करण्यात आल्याचे दाखवण्यात आले होते, असे नंदा यांनी स्पष्ट केले होते.
Edited By- Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com