कोकणातील सिंचनाबाबत राज्यपाल सकारात्मक; रामदास कदमांनी वाचला होता अन्यायाचा पाढा

प्रथमत: रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांची तहान भागवावी व नंतरच इतरत्र पाणी वळविण्याचा प्रस्ताव आणावा, अशी मागणी रामदास कदम यांनी केली होती. या मागणीच्या अनुषंगाने कोश्‍यारी यांनी राज्याचे अपर मुख्य सचिव व राज्य नियोजन विभाग यांच्याकडून अहवाल मागवला आहे.
Ramdas Kadam Bhagtsinh Koshyari
Ramdas Kadam Bhagtsinh Koshyari

खेड  : कोकणातील सिंचनासाठी तीन हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करावा, या माजी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या मागणीला राज्यपाल कोश्‍यारी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, अपर मुख्य सचिव आणि नियोजन विभाग यांच्याकडून अहवाल मागवला आहे. राज्यपालांची स्वाक्षरी असलेले तसे पत्र रामदास कदम यांना प्राप्त झाले.

सिंचनाच्या बाबतीत कोकणावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी माजी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी ११ ऑगस्ट रोजी राजभवन येथे राज्यपालांची भेट घेतली होती. या वेळी त्यांनी राज्यपालांना कोकण विभागाच्या सिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासाठी स्वतंत्र ५ हजार कोटींचा निधी मंजूर उपलब्ध करून द्यावा, असे निवेदन दिले होते. स्वातंत्र्यानंतर कोकणात फक्त १.५ टक्के सिंचन झाले असून पश्‍चिम महाराष्ट्रात ५० टक्के सिंचन झाले आहे. कोकण सुजलाम्‌ सुफलाम्‌ करण्यासाठी येथील धरणांच्या कामांसाठी निधी मिळत नाही; मात्र कोकणच्या हक्काचे असलेल्या कोयनेच्या अवजलापैकी फक्त १० टी. एम. सी. कोकणाला देऊन ५७. ५ टक्के इतरत्र घेऊन जाण्याचा घाट घातला जात आहे.

प्रथमत: रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांची तहान भागवावी व नंतरच इतरत्र पाणी वळविण्याचा प्रस्ताव आणावा, अशी मागणी या निवेदनात रामदास कदम यांनी केली होती. या मागणीच्या अनुषंगाने कोश्‍यारी यांनी राज्याचे अपर मुख्य सचिव व राज्य नियोजन विभाग यांच्याकडून अहवाल मागवला आहे.

नाणार प्रकल्प लादू नये
कोकणावर नाणार प्रकल्प लादू नये, अशी कोकणवासीयांची मागणी आहे, परंतु याच नाणार प्रकल्पासाठी ७.५ टीएमसी पाण्याची तरतूद केली गेली. हे सारे कोकणावर अन्यायकारक असल्याने कोकणच्या बाहेर ५० टीएमसी पाणी वळविण्याचा जो प्रस्ताव आहे, तो रद्द करून फक्त २५ टीएमसी पाणी मुंबईसाठी किंवा रायगडसाठी वळविण्यात यावे.

दृष्टिक्षेपात..
स्वातंत्र्यानंतर कोकणात १.५ टक्केच सिंचन
कोयनेच्या अवजलापैकी १० टी. एम. सी. कोकणाला
५७.५ टक्के इतरत्र घेऊन जाण्याचा घाट
मागणीच्या अनुषंगाने राज्यपालांनी अहवाल मागवला
Edited By- Amit Golwalkar 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com