विरोधी पक्षाची सरकारे पाडण्याची षडयंत्रे राजभवनावर शिजतात  ः थोरात

सत्ता, पैसा आणि राज्यपालांच्या कार्यालयाचा गैरवापर करून भारतीय जनता पक्ष देशाच्या विविध राज्यातील विरोधी पक्षाची सरकारे पाडण्याचा प्रयत्न करत आहे. हे कृत्य संविधानविरोधी असून लोकशाहीची हत्या करण्याचा प्रकार आहे.
Conspiracies to overthrow opposition governments are brewing at Raj Bhavan: Thorat
Conspiracies to overthrow opposition governments are brewing at Raj Bhavan: Thorat

मुंबई  ः ‘‘सत्ता, पैसा आणि राज्यपालांच्या कार्यालयाचा गैरवापर करून भारतीय जनता पक्ष देशाच्या विविध राज्यातील विरोधी पक्षाची सरकारे पाडण्याचा प्रयत्न करत आहे. हे कृत्य संविधानविरोधी असून लोकशाहीची हत्या करण्याचा प्रकार आहे,’’ अशी टीका काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

संविधान आणि लोकशाही परंपरांना पायदळी तुडवत राजस्थानचे राज्यपाल लोकनियुक्त सरकार पाडण्यासाठी भाजपला मदत होईल, अशा प्रकारे वागत आहेत. त्यांच्याविरोधात आज सकाळी महसूल मंत्री थोरात यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथे राजभवनासमोर आंदोलन करण्यात आले. या वेळी केंद्रातील भाजप सरकारचा आणि राज्यपालांचा निषेध करण्यात आला. 

या वेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, माजी मंत्री नसीम खान, माजी आमदार मधू चव्हाण, मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश यादव यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पडत्या पावसात काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी केंद्र सरकार आणि भारतीय जनता पक्ष यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. 

या वेळी प्रदेशाध्यक्ष थोरात म्हणाले की, काँग्रेसने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले आणि स्वातंत्र्यानंतर देशात लोकशाही रूजवली. पण २०१४ मध्ये केंद्रात सत्तेत आल्यापासून भाजप सरकार सातत्याने जनमताचा अनादर करत आहे. सत्ता आणि पैशाचा गैरवापर करून विविध राज्यांतील विरोधी पक्षाची लोकनियुक्त सरकारे पाडणे. तसेच अनैतिक व भ्रष्ट मार्गाने सत्ता मिळवणे, हीच भारतीय जनता पक्षाची कार्यपद्धती राहिली आहे. त्यासाठी राज्यपालांच्या कार्यालयांचा म्हणजे राजभवनांचा गैरवापर करण्यात येत आहे. अनेक राज्यातील सरकारे पाडण्याची षडयंत्रे राजभवनावर शिजली जात आहेत, असा आरोपही  या वेळी थोरात यांनी केला. 

राजस्थानात राज्यपालाची भूमिका संशयास्पद आणि पक्षपातीपणाची आहे. अशोक गहेलोत यांच्या नेतृत्वाखाली सरकारने बहुमत सिद्ध करण्यासाठी विधानसभेचे अधिवेशन बोलवण्याची मागणी केली आहे. पण आमदारांचा घोडेबाजार करण्यासाठी भाजपाला अवधी मिळावा म्हणून राज्यपाल अधिवेशन बोलवत नाहीत, असा आरोप करून राज्यपाल संविधान आणि लोकशाहीला पायदळी तुडवत आहेत, असे थोरात म्हणाले.

राजस्थानातील काँग्रेस सरकार अस्थिर करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. राज्यपाल केंद्र सरकारच्या दबावाखाली वागत आहेत. दुर्देवाने राजभवनं राजकारणाचे अड्डे बनली आहेत, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण म्हणाले

Edited By Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com