कंगना प्रकरणात बोलल्यानेच सरनाईकांवर कारवाई : छगन भुजबळांचा आरोप

विरोधी पक्षातील एखादा नेता जो व्यक्ती केंद्र सरकारच्या विरोधात जास्त बोलेल त्याला ईडीची भीती दाखवली जात आहे. मी बोललो म्हणून माझ्यावर केसेस दाखल केल्या. पवार साहेब निवडणुकीच्या काळात बोलले तर त्यांना नोटीस पाठवली जात आहे. त्यामुळे सुडापोटी ही कारवाई केली जात आहे, असा आरोप राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी येथे केला.
Chagan Bhujbal - Kangana Ranaut - Pratap Sarnaik
Chagan Bhujbal - Kangana Ranaut - Pratap Sarnaik

मुंबई :  विरोधी पक्षातील एखादा नेता जो  व्यक्ती केंद्र सरकारच्या विरोधात जास्त बोलेल त्याला ईडीची भीती दाखवली जात आहे. मी बोललो म्हणून माझ्यावर केसेस दाखल केल्या. पवार साहेब निवडणुकीच्या काळात बोलले तर त्यांना नोटीस पाठवली जात आहे. त्यामुळे सुडापोटी ही कारवाई केली जात आहे, असा आरोप राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी येथे केला.

आज राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात जनता दरबार कार्यक्रमावेळी ते बोलत होते. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या विरोधात ईडीने केलेल्या कारवाईबाबत त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. ही कारवाई सुडापोटी असल्याचे ते म्हणाले. "प्रताप सरनाईक यांच्या घरी ईडीचा छापा पडल्याचे वृत्त मी पाहिले आहे. सरनाईक हे सातत्याने कंगना आणि अर्णबच्या प्रकरणात महाराष्ट्राच्या बाजूने बोलत होते म्हणूनच त्यांच्यावर ईडी कडून छापा टाकला गेला आहे," असा आरोप त्यांनी केला.

राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल असे ते म्हणाले. भाजपाकडून सातत्याने सरकार पाडण्याच्या वक्तव्याचा अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी चांगलाच समाचार घेतला. "जे स्वप्नरंजन करुन घेत असतील आणि त्यात त्यांना आनंद मिळत असेल तर त्यांचा आनंद आपण का भंग करावा? भाजपाला सरकार पडण्याची स्वप्ने पडत असतील तर त्यांनी जरूर स्वप्ने पहावीत," असा टोला देखील भुजबळ यांनी यावेळी लगावला.

दरम्यान, शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक यांच्या ठाणे येथील घर आणि कार्यालयांवर आज सकाळी ईडीच्या पथकाने धाडी टाकत कारवाई केली. यामुळे शिवसेनेमधून संतप्त प्रतिक्रिया उमटायला सुरवात झाली आहे. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी ईडी असो की आणखी कुणी, आम्ही कुणाच्या बापाला घाबरत नाही. कितीही प्रयत्न केले तरी राज्यातील महाविकास आघाडी सरकार व या सरकारमधील नेते कुणाला शरण जाणार नाहीत, असा इशारा राऊत यांनी दिला आहे. हे सरकार पुढील चार वर्ष आणि त्यापुढेही पंचवीस वर्ष कायम राहील, असेही राऊत यांनी निक्षून सांगितले.

प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयांवर ईडीकडून धाडी टाकल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. संजय राऊत यांनी तर भाजप आणि केंद्रातील सरकारला आम्ही कुणाच्या बापाला घाबरत नाही, हिंमत असेल तर घरी या  आणि अटक करून दाखवा, असे खुले आव्हानच दिले आहे. ईडीच्या कारवाईनंतर प्रसारमाध्यमांशी बोलतांना संजय राऊत म्हणाले,  "केंद्रातील भाजप सरकारकडून सुडाचे राजकारण देशभरात सुरू आहे. ईडीने एखाद्या राजकीय पक्षाची शाखा असल्या सारखं वागू नये,''
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com