मुंबई : काही वेळापूर्वी नाथाभाऊ यांचा राजीनामा माझ्याकडे पोहचला आहे. त्यांनी राजीनामा का दिला ते त्यांनाच विचारा, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. ते ज्या पक्षात गेलेत तेथे चांगलं काम करतील त्यासाठी त्यांना शुभेच्छा आहेत, असेही पाटील म्हणाले.
खडसे यांनी आज भारतीय जनता पक्षाचा राजीनामा दिला. येत्या शुक्रवारी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. शुक्रवारी एकनाथ खडसे यांचा पक्ष प्रवेश आहे. त्यांच्या सोबत कोण येणार यावर अजून आमची चर्चा झाली नाही. भाजपमध्ये त्यांच्यावर अन्याय झाला. भाजप विकास करू शकणार नाही असं ज्या नेत्यांना वाटतंय ते सर्वजण आमच्याकडे येतील, अशी घोषणा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
खडसे यांच्या या निर्णयाने भाजपला धक्का बसला आहे. जयंत पाटील यांच्या ट्विटला त्यांनी रिट्विट केलं त्यावेळी मी त्यांना फोन केला आणि त्यांनी ते ट्विट डिलीट केलं त्यावेळी आम्ही आशावादी होतो. पण त्यांनी राजीनामा दिला आहे. आम्ही यातून मार्ग काढून पुढे जाऊ असे वाटत होतं. त्यांनी राजीनामा दिला हे कटू सत्य आहे. त्यांनी आमचं नेतृत्व करावं हे आमची इच्छा होती, असेही पाटील म्हणाले.
खडसेंनी पत्रकार परिषद घेऊन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्यामुळेच मी पक्षाचा राजीनामा दिला असे खडसे म्हणाले आहेत. त्यावर फडणवीस यांनी या आरोपांबाबत स्पष्टीकरण दिले आहे, असे पाटील म्हणाले.
Edited By - Amit Golwalkar
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.