भाजपचे सर्व आमदार मुंबईकडे रवाना 

गेल्या दोन दिवसांपासून राज्यात वेगवान घडामोडी घडत आहेत. राज्यातील प्रमुख नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. या सर्व घडामोडींचा पुढचा अंक म्हणजे भारतीय जनता पक्षाने आपल्या सर्व म्हणजे 105 आमदारांना तातडीने मुंबईला पाचारण केले आहे. हे सर्व आमदार सकाळीच मुंबईकडे रवाना झाले असून दुपारी चारपर्यंत ते मुंबईत पोचणार असल्याची माहिती आहे.
 BJP calls all MLAs in Mumbai
BJP calls all MLAs in Mumbai

मुंबई ः गेल्या दोन दिवसांपासून राज्यात वेगवान घडामोडी घडत आहेत. राज्यातील प्रमुख नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. या सर्व घडामोडींचा पुढचा अंक म्हणजे भारतीय जनता पक्षाने आपल्या सर्व म्हणजे 105 आमदारांना तातडीने मुंबईला पाचारण केले आहे. हे सर्व आमदार सकाळीच मुंबईकडे रवाना झाले असून दुपारी चारपर्यंत ते मुंबईत पोचणार असल्याची माहिती राजकीय वर्तुळातून मिळत आहे. 

दरम्यान, येत्या 48 तासांत राज्यात मोठी उलथापालथ होईल, असा दावा भाजपच्या गोटातून करण्यात येत आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यातील जनतेचे लक्ष मुंबईकडे लागले आहे. दरम्यान, माजी मुख्यमंत्री, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची दुपारी चार वाजता मुंबईत पत्रकार परिषद होणार आहे. या सर्व घडामोडी पाहता या पत्रकार परिषदेला महत्त्व आले आहे. 
हा सर्व घटनाक्रम पाहता राज्यावर आलेल्या कोरोनाच्या संकटापाठोपाठ आत राजकीय अस्थिरतेचे संकट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 


ठाकरे सरकार मजबूत आणि स्थिर ः शरद पवार 

मुंबई ः राज्यातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार स्थिर आणि मजबूत आहे, त्याला कोणताही धोका नाही. हे महाविकास आघाडीचे सरकार आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज दिली. त्यामुळे गेली दोन दिवसांपासून राज्य सरकारच्या स्थिरतेबाबत सुरू असलेल्या राजकीय चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. 

गेली काही दिवसांपासून राज्यपालांना भेटणाऱ्या राजकीय नेत्यांच्या सिलसिल्यामुळे राज्यात दोन दिवसांपासून राजकीय घडामोडी आणि चर्चांना उधाण आले होते. त्यावर पवार यांच्या या प्रतिक्रियेमुळे पडदा पडला आहे. 

पवार म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार मजबूत आणि स्थिर आहे. उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी महाविकास आघाडीतील कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस पूर्ण ताकदीनिशी उभे आहेत. सध्या राजकारणाचा विषय नाही, त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारला कोणताही धोका नाही. राज्यातील कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी तीनही पक्षांनी संपूर्ण ताकद लावण्याचे ठरविले आहे, तो आमच्या सरकारचा अजेंडा आहे. 

दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनी आपल्याला चहापानाचे दोनवेळा निमंत्रण दिले होते, त्यामुळे त्यांच्या निमंत्रणावरून मी राजभवनावर राज्यपालांना भेटायला गेलो होते. दुसरे कोणतेही कारण नव्हते. या वेळी कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. 

ज्या वेळी कोश्‍यारी हे उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते, त्या वेळी शरद पवार हे केंद्र सरकारमध्ये कृषिमंत्री होते. त्या वेळी उत्तराखंड राज्याला केंद्रातून शरद पवार यांनी मदत केली होते. या सर्व जुन्या आठवणींना या वेळी उजाळा मिळाल्याचे पवार यांनी सांगितले. तसेच राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनी राज्यातील उद्धव ठाकरे यांच्या सरकारचे चांगल्या कामाबाबत कौतुक केले आहे. शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस हे तीनही पक्ष राज्यात चांगले काम करीत आहेत, असे गौरवास्पद उद्‌गारही राज्यपालांनी काढल्याचे शरद पवार यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com