तुमच्याकडे सत्तेचा माज आहे, विसरू नका आमच्याकडे राज (साहेब) आहे 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्ष तथा राज ठाकरे यांचे खंदे समर्थक अविनाश जाधव यांना शुक्रवारी (ता. 31 जुलै) पोलिसांनी ताब्यात घेतले. ठाणे आणि पालघरमध्ये तब्बल 20 हून अधिक गुन्हे दाखल असल्याने विरारच्या उपविभागीय पोलीस अधिकारी अर्चना बागडे यांनी त्यांना हद्दपारीची नोटीस बजावली आहे. त्यावर मनसेकडून अत्यंत परखड शब्दांत प्रतिक्रिया आली आहे.
You have power, don't forget we have Raj (Saheb) : Bala Nandgaonkar
You have power, don't forget we have Raj (Saheb) : Bala Nandgaonkar

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्ष तथा राज ठाकरे यांचे खंदे समर्थक अविनाश जाधव यांना शुक्रवारी (ता. 31 जुलै) पोलिसांनी ताब्यात घेतले. ठाणे आणि पालघरमध्ये तब्बल 20 हून अधिक गुन्हे दाखल असल्याने विरारच्या उपविभागीय पोलीस अधिकारी अर्चना बागडे यांनी त्यांना हद्दपारीची नोटीस बजावली आहे. त्यावर मनसेकडून अत्यंत परखड शब्दांत प्रतिक्रिया आली आहे. 

कारवाईबाबत मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी अत्यंत तिखट शब्दांत सरकारवर हल्ला केला आहे. फेसबुकच्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की "काल आमचा अविनाश हा नेहमीप्रमाणे लोकांचे प्रश्न घेऊन आंदोलन करीत होता. मनसेचा प्रत्येक कार्यकर्ता हा लोकांचे प्रश्न पोटतिडकीने मांडत असतो व लोकांसाठीच लढा देत असतो. त्याचप्रमाणे अविनाश व त्याचे सहकारी गेली अनेक महिने लोकांचे प्रश्न घेऊन आंदोलन करीत आहेत.' 

जनतेचे प्रश्न संपूर्ण राज्यात मांडून त्यांना न्याय देण्याचे काम महाराष्ट्र सैनिक करत आहे. विविध प्रकारच्या सेवेद्वारे आमच्या महाराष्ट्र सैनिकांनी जनतेच्या मनात घर केले आहे आणि हेच सत्ताधाऱ्यांचे दुखणे आहे. परंतु तुम्ही सत्तेचा माज करून सुडाचे राजकारण जर कराल तर हे विसरू नका कौरवांची सेना एकीकडे आणि श्रीकृष्ण एकीकडे आणि विजय हा जिथे कृष्ण त्यांचाच होतो. मागे असेच साहेब (राज ठाकरे) बोलले होते, ते कायम लक्षात ठेवावे, असे आव्हान नांदगावकर यांनी सत्ताधाऱ्यांना दिले आहे. 

तसेच शेवटी "मौका सभी को मिलता है!' असा इशारा देऊन "अविनाश तू अजिबात चिंता करू नको, आम्ही सर्व आहोतच,' अशा शब्दांत अविनाश जाधव यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे संकेत मनसे नेत्यांनी दिले आहेत. 

ठाणे महापालिकेच्या मुख्यालयासमोर आंदोलनाच्या पवित्र्यात असलेल्या जाधव यांना ठाणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने ताब्यात घेतले होते. शुक्रवारी सायंकाळीदेखील जाधव यांच्यावर नौपाडा पोलिस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांच्या या कारवाईमुळे मनसे संतप्त झाली आहे 

मनसे जिल्हाध्यक्ष जाधव यांनी,काही दिवसांपूर्वीच भेट नाकारणाऱ्या वसई-विरार मनपा आयुक्ताच्या दालनात शिरून आंदोलन केले होते. या प्रकरणी त्यांच्यासह मनसैनिकांवर गुन्हे दाखल झाले होते. या पाश्वभूमीवर,वसई-विरार उपविभागीय पोलीस अधिकारी अर्चना बागडे यांनी जाधव यांच्यावर दाखल असलेल्या 17 न्यायप्रविष्ठ आणि 3 तपास सुरू असलेल्या गुन्ह्यांची जंत्री मांडून पालघर जिल्ह्यालगतचे ठाणे, ठाणे ग्रामीण, नवी मुंबई, बृहन्मुंबई व रायगड या भागासाठी हददपारीची नोटीस बजावली. 

अविनाश जाधव यांच्यावरील कारवाई अन्यायकारक असून पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजकीय सूडबुद्धीने कारवाई केल्याने आम्हाला रस्त्यावर उतरायला भाग पाडू नका, असा इशारा मनसे नेते अभिजीत पानसे यांनी दिला आहे. 

Edited By Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com