नवी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आज पहाटे अचानक पणे नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीला( APMC) भेट देत तेथील शेतकरी, माथाडी कामगार यांच्या समस्या जाणून घेत त्यांच्याशी संवाद साधला.
केंद्र सरकारने कृषी कायदे राज्य सरकारवर लादले आहेत. तरी राज्य सरकार शेतकर्यांच्या हिताचा नक्कीच विचार करेल, असे आश्वासन त्यांनी शेतकऱ्यांना दिले.
त्याच बरोबर रोहित पवारांनी ठिकठिकाणी थांबून व्यापारी आणि शेतकऱ्यांची विचारपूस केली. शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना एपीएमसीमध्ये येणाऱ्या अडचणी येत्या अधिवेशनात मांडणार, असल्याचेही त्यांनी सांगितले.
“आम्ही लोकप्रतिनिधी असतो तेव्हा शेतकरी फोन करत असतात. तीन महिने झाले व्यापाऱ्याकडून पैसे नाही आले, हा व्यापारी दर कमी देत आहे वैगेरे तक्रार करतात. तेव्हा आम्ही त्या एपीएमसी मार्केटच्या प्रमुखांशी बोलून विषय सुटतो का यासाठी प्रयत्न करत असतो, त्यामुळे मार्केट म्हत्वाची आहेत, असे ते म्हणाले.
यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना पवार म्हणाले, भाजप सक्तवसुली संचलनालयाचा (ED) वापर करुन विरोधकांना लक्ष्य करत आहे. कदाचित उद्या मलाही ‘ईडी’ची नोटीस येऊ शकते, ईडी मार्फत राजकीय विरोधकांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप पवार यांनी केला.
महानगरपालिका निवडणुकीत तिन्ही पक्ष एकत्र लढू शकतात’
महानगरपालिकांमध्ये महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र लढू शकतात. पण तशा वाटाघाटी आणि समीकरणे जुळून आली पाहिजेत. पदवीधर आणि विधान परिषद निवडणुकीत एकत्रित ताकद मोठी असल्याचे दिसून आले. त्यामुळे आगामी काळातही भाजपाच्या विचारधारेला रोखण्यासाठी महाविकास आघाडी एकत्रित लढेल. पण शेवटी हा निर्णय तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते घेतील, असे रोहित पवार यांनी सांगितले.
Edited By - Amol Jaybhay
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.