Jayant Patil
Jayant Patil

राज्य सरकारने आधी गोरगरीबांचा विचार केला!

कोरोना विरोधात लढण्याचा संकल्प राज्य सरकारने केला आहे. कोरोना विरोधात `ब्रेक द चेन` ही मोहिम राबविताना विविध निर्बंध लागू केले. ते करताना समाजातील गोरगरीबांचा राज्य सरकारने विचार केला, असे राज्याचे जलसंपदा मंत्री व राष्ट्रवादी कॅाग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.

मुंबई : कोरोना विरोधात लढण्याचा संकल्प राज्य सरकारने केला आहे. कोरोना विरोधात `ब्रेक द चेन` ही मोहिम राबविताना विविध  निर्बंध लागू केले. ते करताना समाजातील गोरगरीबांचा राज्य सरकारने विचार केला, असे राज्याचे जलसंपदा मंत्री व राष्ट्रवादी कॅाग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.  

ते म्हणाले, महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आल्यानंतर संत गाडगेबाबा यांच्या दशसूत्री संदेशाने हे सरकार चालवू असा संकल्प आम्ही केला होता. आज मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या संबोधनातून त्याची प्रचीती आली. कोरोनाविरोधात लढण्यासाठी निर्बंध घालत असताना शासनाने पहिला विचार गोरगरीबांचा केला आहे.

राज्याला व जनतेला या संकटातून बाहेर काढण्यासाठी महाविकास आघाडी शासनाच्या वतीने सर्व प्रयत्न केले जात आहे. प्रशासन अहोरात्र काम करत आहे. आज  आपल्या सहकार्याची नितांत गरज आहे. शासनाच्या सर्व नियमांचे पालन करा ही विनंती, आपण ही साखळी तोडू याचा मला विश्वास आहे. 
...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com