पोलिस भरतीच्या शुद्धीपत्रकावरून नवीन वाद, सरकार मराठा तरुणांना डावलते

राज्यात पोलिस शिपाई भरतीबाबद 2018-19 मध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. मात्र या पदाची भरतीप्रक्रिया कोरोनाच्या आणि इतर कारणास्तव पूर्ण होऊशकली नव्हती.
Police.jpg
Police.jpg

मुंबई ः राज्यात पोलिस भरतीच्या शुद्धीपत्रका वरून नवीन वाद निर्माण झाला आहे. राज्य सरकार या भरती प्रक्रियेतून मराठा समाजाच्या तरुणांनी डावलत असल्याचा आरोप मराठा समाजाकडून केल्या जाऊ लागला आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा चोहट्यावर आला आहे. (New controversy over police recruitment correspondence, government slams Maratha youth)

राज्यात पोलिस शिपाई भरतीबाबद 2018-19 मध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. मात्र या पदाची भरती प्रक्रिया कोरोनाच्या आणि इतर कारणास्तव पूर्ण होऊ शकली नव्हती. पोलिस विभागाकडून या जाहिरातीमध्ये सुधारणा केल्याबाबदचे स्वतंत्र शुद्धीपत्रक महाराष्ट्र पोलीस आणि जिल्हा पोलिस दलाच्या संकेत स्थळावर नुकतेच प्रसिद्ध केले आहे. 

हेहीवाचा..

सामाजिक आणि शैक्षणिक मागास (एस. ई. बी. सी.) या प्रवर्गातील आरक्षित असलेले पद अराखीव म्हणजेच खुल्या प्रवर्गात समाविष्ठ करण्यात आली असल्याने एस. ई. बी. सी. प्रवर्गातून अर्ज भरलेल्या उमेदवारांना शुद्धी पत्रकात दिलेल्या सुचनाप्रमाणे प्रवर्ग बदलण्याच्या सूचना करण्यात आल्या असल्याने, एस. ई. बी. सी. प्रवर्गातून अर्ज भरलेल्या उमेदवारा समोर मोठ्या पेच या शुद्धीपत्रका मुळे निर्माण झाल्या आहे.

एस. ई. बी. सी. प्रवर्गातून अर्ज भरलेल्या उमेदवाराना आपल्या अर्जात बदल करून खुल्या प्रवर्गातून किंवा EWS प्रवर्गातून अर्ज करावा लागणार आहे.

■ एस. ई. बी. सी. प्रवर्गातून अर्ज भरलेल्या उमेदवाराना आपल्या अर्जात बदल करून जर EWS प्रवर्गात अर्ज सादर केला, तर त्याला EWS प्रवर्गाचे प्रमाण पत्र सादर करावे लागणार आहे.

■ EWS प्रवर्गाचे हे प्रमाण पत्र सादर करताना ते प्रमाण पत्र 2020 पूर्वी प्रमाणित असलेले सादर करावे लागणार आहे.

हेही वाचा..


■ 2020 पर्यन्त एस.ई.बी.सी. आरक्षण असल्यामुळे मराठा तरुणांनी एस.ई.बी.सी प्रमाण पत्र काढलेले असताना, अत् 2020 पूर्वी प्रमाणित केलेले EWS प्रवर्गाचे हे प्रमाण पत्र आणायचे कुठून असा मोठा प्रश्न निर्माण झालाय, 

■ शुद्धीपत्रकात प्रवर्ग बदला बाबद 5 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट पर्यन्त ची मुदत देण्यात आलीय,या कालावधीत हे प्रवर्ग न बदलल्यास उमेदवाराचा अर्ज बाद ठरवला जाणार आहे,

■ ज्या उमेदवारांनी या कालावधीत एस.ई.बी.सी प्रवर्गातून EWS प्रवर्गा बदल केला,आणि त्यांनी 2020 पूर्वी प्रमाणित केलेले EWS प्रवर्गाचे हे प्रमाण पत्र सादर न केल्यास त्यांचा ही उमेदवारी अर्ज बाद ठरवला जाणार आहे....

पोलिस भरतीच्या या नव्याने काढण्यात आलेल्या शुद्धीपत्रकवरून पोलिस भर्ती प्रक्रियेतून मराठा तरुणांना दूर ठेवण्याचा डाव राज्य सरकार करत असल्याचा आरोप मराठा समाजाकडून केल्या जात आहे,या शुद्धीपत्रकात तात्काळ बदल करावा अशी मागणी मराठा समाजाकडून केल्या जात आहे.....

बाईट:१:-  प्रल्हाद देशमुख (मराठा आंदोलक

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com