मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला ग्रीड फेल्युअरचा फटका बसला असून मुंबईत सकाळपासून वीज गेली आहे. रेल्वे सेवा, रुग्णालये यावर याचा मोठा परिणाम झाला आहे. वीज पुरवठा सुरळीत होण्यासाठी दुपारचे तीन वाजतील, असा अंदाज आहे. केवळ मुंबईच नव्हे तर ठाणे, अलिबागलाही याचा मोठा फटका बसला आहे.
सकाळी दहा वाजून पन्नास मिनिटांनी टाटा पाॅवर कंपनीकडून पुरवल्या जाणाऱ्या वीजेचे ग्रीड बंद पडले. त्यामुळे अर्ध्या मुंबईचे दिवे गेले. महापारेषणच्या 400 KV कळवा पडघा GIS केंद्रात सर्किट 1 देखभाल-दुरुस्ती सुरू होती. यावेळी सर्व भार सर्किट 2 वर होता. मात्र सर्किट 2 मध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबई व ठाणे मधील बहुतांश भाग प्रभावित आहे, असे सांगण्यात आले आहे. वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे चर्चगेट ते बोरिवली दरम्यानची उपनगरी सेवा बंद झाली आहे.
ग्रीड फेल्युअरचा परिणाम म्हणून कळवा-पडघा आणि खारघर येथील ट्रान्सफाॅर्मर बंद पडले. त्यामुळे मुंबई व उपनगरांना होणारा वीज पुरवठा बंद झाला. पश्चिम रेल्वेप्रमाणेच मध्य रेल्वेच्या कुर्ला ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यानची उपनगरी सेवाही बंद झाली.
Edited By - Amit Golwalkar
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.