फडणवीसांची बुलेटप्रूफ गाडी काढली; चंद्रकांतदादांची सुरक्षा हटवली

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील , प्रसाद लाड यांना तर आता विशेष सुरक्षा नसेल. देवेंद्र फडणवीस यांना नक्षलवाद्यांनी हिटलिस्टमध्ये टाकले असल्याची चर्चा आहे. या संबंधात त्यांच्या निकटवर्तीयांची काळजी घेतली जात होती. मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात त्यांच्या भोवतीचे सुरक्षाकवच अभेद्य करण्यात आले होते
Chandrakant Patil - Devendra Fadanavis
Chandrakant Patil - Devendra Fadanavis

मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुरक्षाव्यवस्था महाविकास आघाडी सरकारने कमी करण्याचा निर्णय घेतला असून त्यांना दिलेले बुलेटप्रूफ वाहन आता काढून घेतले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या सुरक्षाव्यवस्थेतही कपात करण्यात आली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील , प्रसाद लाड यांना तर आता विशेष सुरक्षा नसेल. देवेंद्र फडणवीस यांना नक्षलवाद्यांनी हिटलिस्टमध्ये टाकले असल्याची चर्चा आहे. या संबंधात त्यांच्या निकटवर्तीयांची काळजी घेतली जात होती. मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात  त्यांच्या भोवतीचे सुरक्षाकवच अभेद्य करण्यात आले होते मुख्यमंत्रीपदाच्या काळात शहरीनक्षलवादाबद्दलचे काही निर्णय हे त्यांच्यासाठी आयुष्यभराचे आव्हान ठरल्याचे मानले जाते.

मात्र, काल रात्री उशीरा अचानक त्यांना देण्यात आलेले पायलट वाहन आणि बुलेटप्नुफ गाडी काढून  देण्यात आली. नेत्यांना देण्यात  येणाऱ्या सुरक्षेचा वेळोवेळी आढावा घेतला जात असतो. महाविकास आघाडी सरकारमधील उच्चपदस्थांच्या बैठकीत दोन दिवसांपूर्वी यासंबंधीचा आढावा घेण्यात येणार होता. त्या बैठकीनंतर हे घडले काय याबद्दल उत्सुकता आहे.

संजय बनसोडे, अस्लम शेख अशा काही मंत्र्यांचीही सुरक्षा कमी करण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, सध्या मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासाला सामोरे जाणारे प्रसाद लाड ,कॉंग्रेसमधून बाहेर पडलेले पण अद्याप भाजपमध्ये न प्रवेशलेले कृपाशंकरसिंह यांची सुरक्षा काढून घेण्यात आली आहे.
 शिवसेना भाजपच्या काळात ठाकरे कुटुंबाला देण्यात येणार्या सुरक्षाव्यवस्थेवरून कायम वाद होत असत.

महत्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेचा आढावा घेणारी यंत्रणा उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आढावा बैठका घेत असते. ठाकरे कुटुंबातील चार जणांना वाय सुरक्षा कवच कित्येक वर्षापासून देण्यात आले आहे.महाविकास आघाडी सरकार सत्तेत येताच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची वाय दर्जाची सुरक्षा यंत्रणा झेड करण्यात आली होती. सुमारे एक वर्षापूर्वी क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडुलकर याची सुरक्षा कमी करण्याचा महाविकास आघाडी सरकारचा निर्णयही बहुचर्चित ठरला होता. आशीष शेलार, प्रसाद लाड यांचे सुरक्षादल त्याच सुमारास कमी करता आले.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com