नारायण राणेंच्या होम पीचवर फडणवीस, ठाकरे यांचा दौरा

त्यामुळे राज्याचे लक्ष सिंधुदुर्गकडे असणार आहे.
Uddhav Thackeray, Devendra Fadnavis in Sindhudurg district to inspect the damage caused by the cyclone
Uddhav Thackeray, Devendra Fadnavis in Sindhudurg district to inspect the damage caused by the cyclone

मुंबई :  तोक्ते चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे  शुक्रवारी (ता. 21 मे) रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. नुकसानीची पाहणी करण्याबरोबरच ते प्रशासनाकडून आढावाही घेणार आहेत.

दरम्यान, नुकसानीची पाहणी करण्यासाठी अगोदरच कोकणच्या दौऱ्यावर असलेले माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हेही उद्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी करणार आहेत. खासदार नारायण राणे यांच्या होम ग्राउंडमध्ये म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात फडणवीस, ठाकरे यांच्यासह हेवीवेट नेतेमंडळी असणार आहेत. त्यामुळे राज्याचे लक्ष उद्या (ता. २१ मे) सिंधुदुर्गकडे असणार आहे.  (Uddhav Thackeray, Devendra Fadnavis in Sindhudurg district to inspect the damage caused by the cyclone)

दरम्यान, गेली दोन दिवसांपासून कोकणच्या दौऱ्यावर असलेले विरोधी पक्षनेते फडणवीस हे रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील वादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून आज सिंधुदुर्ग दाखल झाले आहेत. येथे पोचता त्यांनी आज जिल्हाधिकारी आणि अन्य अधिकार्‍यांशी चर्चा करून नुकसानीची प्राथमिक माहिती घेतली. उद्या ते प्रत्यक्ष नुकसानीची पाहणी करणार आहेत. या वेळी त्यांच्यासोबत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, रवींद्र चव्हाण, नीतेश राणे, प्रसाद लाड उपस्थित होते. तत्पूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी बुधवार (ता. १९ मे) रायगडमधील नुकसानीचा, तर गुरुवारी (ता. २० मे) रत्नागिरी जिल्ह्यातील नुकसानीचा आढावा घेतला आहे. 

मुख्यमंत्री ठाकरे हे रत्नागिरीपासून आपल्या पाहणी दौऱ्याला सुरुवात करणार आहेत. त्यानंतर ते सिंधुदुर्ग जिल्ह्याला भेट देणार आहेत. नुकसानीची पाहणी करण्याबरोबच ते प्रशासनाकडून आढावाही घेणार आहेत. त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे असणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे शुक्रवारी सकाळी ८.३५ वाजता रत्नागिरी विमानतळ येथे आगमन होणार आहे. तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीबाबत जिल्हा प्रशासनासमवेत ते ८.४० वाजता आढावा बैठक घेणार आहेत. त्यानंतर ते सकाळी ९.४० वाजता हेलिकॉप्टरने चिपी विमानतळ, सिंधुदुर्ग येथे आगमन व  मोटारीने वायरी (ता.मालवणकडे) प्रयाण करणार आहेत.

मुख्यमंत्री ठाकरे हे सकाळी १०.१० वाजता वायरी (ता. मालवण) येथे तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करतील. त्यानंतर  सकाळी १०.२५ वाजता मोटारीने मालवण येथे आगमन तेथील चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतील. सकाळी ११.०५ वाजता निवती (ता. वेंगुर्ला) येथील नुकसानीची पाहणी करतील. या पाहणीनंतर सकाळी ११.३० वाजता चिपी विमानतळाच्या बैठक सभागृह येथे मोटारीने आगमन होणार आहे. तौक्ते वादळामुळे झालेल्या नुकसानीचा जिल्हा प्रशासनासमवेत आढावा बैठक होणार आहे.  

या आढावा बैठकीनंतर चिपी विमानतळ येथून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे हेलिकॉप्टरने रत्नागिरीकडे प्रयाण करतील. त्यानंतर दुपारी १२.३५ वाजता रत्नागिरी विमानतळ येथे आगमन आणि तेथून विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com