असं काय घडलं की आमदार वैभव नाईकांना सुरक्षा पुरवावी लागली?

राज्य सरकार दुतोंडी भूमिका घेतेय. राज्य सरकारमध्ये बसलेल्या शिवसेनेने आगीशी खेळू नये, आगीशी खेळन माहिती नसेल तर त्यांनी त्याची अनुभूती घ्यावी, असा इशारा शेलार यांनी शिवसेनेला दिला.
Ashish Shelar jpg
Ashish Shelar jpg

सिंधुदुर्ग : राज्य सरकारने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप खासदार नारायण राणे यांच्यासह अनेक भाजप नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत कपात केली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयावर विरोधकांनी मोठ्या प्रमाणात टीका केली आहे. भाजप नेते अशिष शेलार यांनी अस काय घडलं नारायण राणेंची सुरक्षा काढली आणि शिवसेना आमदार वैभव नाईक यांना सुरक्षा पुरवावी लागली. असा, सवाल ठाकरे सरकारला विचारला आहे. 

शेलार सावंतवाडीमध्ये बोलत होते. नारायण राणे हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. त्यांनी राज्याचं आणि कोकणाचं नेतृत्व केलंय. त्यांना पुरवलेली सुरक्षा काढून घेतली आहे. दुसरीकडे शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांना सुरक्षा देण्यात आली आहे. हा माजी मुख्यमंत्र्यांसोबत केलेला दुर्व्यवहार आहे. यापूर्वी राज्यात असं कधीही घडलं नाही. असं काय घडलं की वैभव नाईक यांना सुरक्षा पुरवावी लागली. असा प्रश्न आशिष शेलार यांनी राज्य सरकारला विचारला. 

राज्य सरकार दुतोंडी भूमिका घेतेय. राज्य सरकारमध्ये बसलेल्या शिवसेनेने आगीशी खेळू नये, आगीशी खेळन माहिती नसेल तर त्यांनी त्याची अनुभूती घ्यावी, असा इशारा शेलार यांनी शिवसेनेला दिला. 

ग्रामपंचायत निवडणुका सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर सिंधुगुर्गमध्ये येण्याचे कारण विचारले असता, प्रचारासाठी आलो नसल्याचे शेलारांनी सांगितले. तसेच, या निवडणुकीत भाजप स्थानिक पातळीवर सक्रिय आहं. वरुन काही प्रचार, प्रसार किंवा व्यापक स्वरुपात योजना तयार केली नाही. केवळ या निवडणुकीत कार्यकर्त्यांचं मनोबल टीकून राहावं म्हणून प्रवास करत असल्याचे शेलारांनी यावेळी सांगितले.  

संजय राऊत काय म्हणाले?

राज्यातील नेत्यांच्या सुरक्षाव्यवस्थेत कपात करण्याबाबत कोणतंही राजकारण करण्यात आलं, असं मला वाटत नाही. कारण आमचीही सुरक्षा व्यवस्था यापूर्वी काढलेल्या आहेत. त्यावेळी आम्ही कधी बोंबललो नाही. मागील सरकारच्या काळात आम्ही सरकारमध्ये असतानाही माझी सुरक्षा काढून घेतली होती, पण मी एका शब्दानं तक्रार केली नाही.

सरकारी यंत्रणांची एक कमिटी असते, त्यामध्ये महत्वाची लोकं असतात, ते निर्णय घेत असतात. महाराष्ट्राचं सरकार जागरुक आणि संवेदनशील आहे. विरोधकांच्या जीवाशी खेळावं किंवा त्यांच्याशी सूडबुद्दीने वागावं असा ट्रेन्ड सध्या राष्ट्रीय राजकारणात सुरु आहे. अशा प्रकारची भावना आणि भूमिका उद्धव ठाकरे सरकारची आहे असं कोणीही म्हणू शकणार नाही.

माझ्या जीवाचं काही बरंवाईट झाल तर....

माझ्या जीवाचं काही बरंवाईट झालं तर याला सरकार जबाबदार असेल नारायण राणे म्हणाले होते. राज्य सरकारने माझी सुरक्षा कालच काढली. मला केंद्र सरकारची सुरक्षा आहे. अतिरेक्यांपासून माझ्या जीवाला धोका असल्यामुळे मुंबई पोलिसांनी सुरक्षा दिली होती. पण राज्य सरकारने माझ्या सुरक्षा व्यवस्थेत कपात केली आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com