BJP's Vinay Natu criticizes Shiv Sena from Ratnagiri Zilla Parishad presidency
BJP's Vinay Natu criticizes Shiv Sena from Ratnagiri Zilla Parishad presidency

शिवसेनेचा एकही सदस्य झेडपी अध्यक्षपदासाठी लायक नव्हता का? 

शिवसेनेची स्थिती हतबल मातोश्री आणि लाचार सेना, अशी झाली आहे.

गुहागर (जि. रत्नागिरी) : "हतबल मातोश्री आणि लाचार सेना अशी शिवसेनेची स्थिती झाली आहे; म्हणूनच पूर्ण बहुमत असतानाही शिवसेनेने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तिकीटावर निवडून आलेल्या उमेदवाराला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष केले आहे. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी चालणाऱ्या शिवसैनिकांनी आता आत्मपरिक्षण करावे,'' अशी प्रतिक्रिया उत्तर रत्नागिरी भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष डॉ. विनय नातूंनी व्यक्त केली आहे. 

रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडीबाबत बोलताना माजी आमदार आणि भाजपचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातूंनी इतिहास सांगितला. डॉ. नातू म्हणाले ""सन 1997 पासून भारतीय जनता पक्षासोबत युती करून शिवसेना जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांना सामोरी जात असे. निवडणुकांपूर्वी जागा वाटपामध्ये खेळीमेळीचे वातावरण ठेवणारी शिवसेना बहुमत मिळाल्यावर मात्र भाजपला सत्तेचा वाटा देण्यास राजी नसायची. तेव्हा शिवसैनिकांनाही भाजपला दूर ठेवण्याचा आनंद मिळायचा.'' 

"सध्या तर शिवसेनेकडे पूर्ण बहुमत असताना जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तिकीटावर निवडून आलेल्या आणि अजूनही राष्ट्रवादीत असलेल्या जिल्हा परिषद सदस्याला दिले. त्यामुळे शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आलेला एकही जिल्हा परिषदेचा सदस्य अध्यक्षपदासाठी लायक नव्हता का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवसेनेची स्थिती हतबल मातोश्री आणि लाचार सेना, अशी झाली आहे. याचे शिवसैनिकांना आत्मपरिक्षण करावे,'' असा टोला नातू लगावला आहे. 

हेही वाचा : राणेंचा शिवसेनेला धोबीपछाड; झेडपी अध्यक्षपदी भाजपच्या संजना सावंत 


सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतील भारतीय जनता पक्षाच्या ताब्यातील सत्ता मिळविण्याचे शिवसेनेचे प्रयत्न हाणून पाडत खासदार नारायण राणे यांनी शिवसेनेला धोबीपछाड दिला आहे. भाजपच्या संजना सावंत यांनी शिवसेनेच्या वर्षा कुडाळकर यांच्यावर 30 विरोध 19 मतांनी विजय मिळविला. विजयानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी आमदार नीतेश राणे यांच्यासह आनंदोत्सव साजरा केला. तसेच, शिवसेनेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. 

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी बुधवारी (ता. 24 मार्च) मतदान झाले. त्यात भाजपकडून संजना सावंत यांना उमेदवारी देण्यात आली होती, तर शिवसेनेकडून वर्षा कुडाळकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आले होते. शिवसेनेकडून जिल्हा परिषदेतील भाजपची विशेषतः राणे कुटुंबीयांची सत्ता उलथवून टाकण्यासाठी प्रयत्न करण्यात येत होते. प्रत्यक्ष मतदानात ते रुपांतरित झालेच नाहीत. राणे गटाने उमेदवारी जाहीर केलेल्या संजना सावंतांनी शिवसेनेच्या वर्षा कुडाळकर यांचा पराभव करत सत्ता कायम राखली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com