मुंबई : राष्ट्रवादी अध्यक्ष आणि एमसीए सदस्य शरद पवार यांच्या मध्यस्ती नंतर ऑस्ट्रेलियातून परत आलेल्या टीम इंडियाला विलीगिकरणातून सूट मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत फोन केल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यानंतर मुंबई महापालिकेने ऑस्ट्रेलियातून विजय मिळवून आलेल्या टीम इंडियाला मुंबई विमानतळावर विलगीकरणात न ठेवण्याचा निर्णय घेतला.
भारतीय संघाने पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. कारण ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत पराभूत करण्याची किमया टीम इंडियाने करुन दाखवली आहे. चौथ्या आणि शेवटच्या कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियावर ३ गडी राखून विजय मिळवला. या सामन्यातील विजयासह भारताने कसोटी मालिका देखील २-१ ने आपल्या नावावर केली. पहिलाच कसोटी सामना गमविल्यानंतर भारतीय संघ ही मालिका गमावेल असेच सर्वांना वाटत असताना ज्या पद्धतीने भारतीय संघाने कर्णधार अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात मालिका विजय मिळवला. चौथ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला चारीमुंड्या चीत करत दणदणीत विजय मिळवला.
आता टीम इंडिया भारतात परतली आहे. सध्या ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा विषाणू सापडला आहे. जर्मनीतही कोरोनाचा नवा विषाणू सापडला आहे. त्यामुळे भारतात परदेशातून येणाऱ्या टीम इंडियाचे पुढचे सामने चेन्नईला होणार आहेत
त्याआधी खेळाडू यांना कुटुंब समवेत काही वेळ घालवायचा होता. नियमानुसार विलीगिकरण हे करावे लागले असते. मात्र आता मुंबई महापालिकेने या खेळाडूंना त्यांच्या घरी जाण्याची परवानगी दिली आहे. अजिंक्य राहणे, पृथ्वी शाॅ आणि टीम इंडियाचे प्रशिक्षक माजी कसोटीपटू रवी शास्त्री आज सकाळी मुंबईत परतले.
Edited By - Amit Golwalkar
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.