पोलिस आयुक्त सचिन वाझेंशी काय चर्चा करतात?

मनसुख हिरेन हत्या प्रकरणात प्रमुख संशयित असलेल्या सचिन वाझे यांची एकाच दिवसात दोन-दोन वेळा बदली करण्यात आली. मात्र अद्यापही ते मुंबई पोलिसांच्या सेवेत आहेत.
Atul Bhatkhalkar
Atul Bhatkhalkar

नाशिक : मनसुख हिरेन हत्या प्रकरणात प्रमुख संशयित असलेल्या सचिन वाझे यांची एकाच दिवसात दोन-दोन वेळा बदली करण्यात आली. मात्र अद्यापही ते मुंबई पोलिसांच्या सेवेत आहेत. हे सर्व संशय वाढविणारे आहे, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे.  

ते म्हणाले, मुंबईचे पोलीस आयुक्त अशा आरोपी सोबत दोन तास चर्चा करतात, हे अत्यंत धक्कादायक असून चौकशीत दबाव येऊ नये याकरिता त्यांना तात्काळ निलंबित करा किंवा त्यांची किमान मुंबईबाहेर बदली करण्याची मागणी आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

ते म्हणाले, मनसुख हिरेन प्रकरण सध्या राज्यभर चर्चेचा विषय आहे. या प्रकरणात सहाय्यक पोलिस निरीक्षक वाझे हे संशयीत आहेत. त्यामुळे ते सेवेत कसे असा प्रश्न पडतो. मुंबई शहराचे पोलिस आयुक्त त्यांच्याशी दोन दोन तास कसली चर्चा करतात? एटीएस त्यांचा पाठपुरावा करीत आहे आणि अशा अधिका-याशी पोलिस आयुक्त चर्चा करतात, यातून काय संदेश जातो. त्यांना नागरी सेवा केंद्रात पाठविल्याचे दाखऴतात, मात्र परत त्यांच्याशीच चर्चा व संपर्कात राहतात. हे सगळे संशय वाडविणारे आहे. 

काय आहे प्रकरण?

मनसुख हिरेन हे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या जीपमधील स्फोटकांशी संबंधीत गाडी ताब्यात असलेले व्यक्ती आहेत. त्यांची चौकशी सुरु होती. या दरम्यान त्यांचा मृतदेह सापडला खाडीत होता. त्यावरुन विधीमंडळात विरोधी पक्षांनी हा विषय चांगलाच लावून धऱला होता. त्यानंतर सचिन वाझे यांची बदली करण्याची घोषणा गृहमंत्र्यांनी केली होती.
...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com