महाराष्ट्राच्या राज्यपालांनी चक्क मिळवले पत्र लेखन स्पर्धेत पहिले बक्षीस

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोशयारी यांना चक्क निबंध स्पर्धेत बक्षीस मिळाले आहे. टपाल खात्यातर्फे आयोजित केलेल्या एका स्पर्धेत राज्यपालांनी भाग घेतला होता. त्यात त्यांना २५ हजार रुपयांचे बक्षीस मिळाले आहे.
Bhatsingh Koshyare Won Prize in Letter writing Competition
Bhatsingh Koshyare Won Prize in Letter writing Competition

मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोशयारी यांना चक्क निबंध स्पर्धेत बक्षीस मिळाले आहे. टपाल खात्यातर्फे आयोजित केलेल्या एका स्पर्धेत राज्यपालांनी भाग घेतला होता. त्यात त्यांना २५ हजार रुपयांचे बक्षीस मिळाले आहे. बक्षीसाची ही रक्कम टपाल विभागातील कोरोना बाधित कर्मचाऱ्यांच्या उपचारासाठी देण्याचा निर्णय राज्यपालांनी जाहीर केला आहे.

टपाल खात्याच्या महाराष्ट्र व गोवा सर्कलच्या वतीने महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. 'बापू तुम्ही अमर आहात' (Bapu You Are Immortal) असा या स्पर्धेचा विषय होता. त्यात राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी पहिले बक्षिस मिळावले.

या स्पर्धेत पुरस्कार रूपाने प्राप्त झालेल्या २५००० रुपयांच्या रकमेत स्वतःच्या वेतनातून आणखी २५००० घालून ही रक्कम डाक विभातील करोना बाधित कर्मचाऱ्यांच्या उपचारासाठी डाक विभागाला देणार असल्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज जाहीर केले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com