सुशांतचा मित्र म्हणतो, अंकिता तू त्याच्याशी लग्न करायला हवे होते !

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर त्याच्या व्यक्तिगत जीवनातील अनेक बाबी समोर येत आहेत. सुशांत आणि अंकिता लोखंडेच्या संबंधाबाबत सोशल मीडियावर सुशांतच्या मित्राने आतापोस्ट टाकली आहे.
sushant singh rajput friend said ankita lokhande should have married sushant
sushant singh rajput friend said ankita lokhande should have married sushant

मुंबई : सुशांतला केवळ अंकिताच वाचवू शकत होती. खरेतर त्या दोघांनी लग्न करायला हवे होते. ते दोघे एकमेकांसाठीचा बनले होते, असे अभिनेता सुशांतसिंह राजपूतचा मित्र संदीपसिंह याने म्हटले आहे. संदीप याने सोशल मीडियावर अंकिताला उद्देशून पोस्ट केली असून, यात त्याने सुशांत आणि अंकिताच्या संबंधांवर प्रकाश टाकला आहे. 

सुशांतच्या आत्महत्येनंतर संदीप हा सुशांतच्या कुटुंबीयांसमवेत कठीण काळात उभा राहिला होता. त्याने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये सुशांत आणि अंकिता यांच्या संबंधांच्या स्मृती जागविल्या आहेत. त्याने म्हटले आहे की, प्रिय अंकिता, जाणाऱ्या प्रत्येक दिवसागणिक मला एक विचार सतावत आहे. आपण सर्वांनीच थोडे अधिक प्रयत्न करुन त्याला थांबवायला हवे होते. तुम्ही दोघे वेगळे झाल्यानंतरही त्याच्या यशासाठी तू प्रार्थना करायचीस. तुम्ही दोघांनी एकत्र राहायला हवे होते. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Dear Ankita, with each passing day, one thought keeps haunting me over and over again. Kaash... I wish... We could have tried even harder, we could've stopped him, we could've begged him! Even when you both seperated, you only prayed for his happiness and success... Your love was pure. It was special. You still haven't removed his name from the nameplate of your house❤️ I miss those days, when the three of us stayed together in lokhandwala as a family, we shared so many moments which bring tears to my heart today...cooking together, eating together, ac ka paani girna, our special Mutton bhaat, our long drives to uttan, lonavala or Goa! Our crazy holi! Those laughs we shared, those sensitive low phases of life when we were there for each other, you more than anyone. The things you did to bring a smile on Sushant's face. Even today, I believe that only you two were made for each other. You both are true love. These thoughts, these memories are hurting my heart...how do I get them back! I want them back! I want 'us three' back! Remember the Malpua!? And how he asked for my mother's Mutton curry like a little kid! I know that only you could've saved him. I wish you both got married as we dreamt. You could've saved him if he just let you be there...You were his girlfriend, his wife, his mother, his best friend forever. I love you Ankita. I hope I never lose a friend like you. I won't be able to take it.

A post shared by Sandip Ssingh (@officialsandipssingh) on

सुशांतसारख्या गुणी अभिनेत्याच्या जाण्याने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. त्याच्या निधनाबद्दल बॉलिवूडसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे. तो केवळ 34 वर्षांचा होता. त्याने अभिनयाबद्दल अनेक पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आले होते. सुशांत याने हिंदी मालिकांमधून अभिनय कारकीर्द सुरू केली. त्याने सुरुवातीला 'किस देश मे है मेरा दिल' ही मालिका केली होती. मात्र, एकता कपूर यांच्या 'पवित्र रिश्ता' या मालिकेने त्याला घराघरात पोचवले. 

त्याने 'काय पो चे' या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. त्याने स्वत:चे नायक म्हणून स्थान हिंदी चित्रपटसृष्टीत निर्माण केले होते. 'शुद्ध देसी रोमांस' या चित्रपटात तो वाणी कपूर आणि परिणिती चोप्रा यांच्यासोबत दिसला होता. भारतीय क्रिकेटसंघाचा माजी कप्तान महेंद्रसिंह धोनी याच्यावरील एम.एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी या चित्रपटात त्याने धोनीच्या भूमिका साकारली होती. या भूमिकेचे प्रेक्षकांसह समीक्षकांनी कौतुक केले होते. तसेच, आमीर खानसोबत पीके चित्रपटातील त्याची भूमिकाही नावाजली गेली होती. त्याच्या मागील काही दिवसांपूर्वी आलेला 'छिछोरे' हा चित्रपट खूप लोकप्रिय ठरला होता. याचबरोबर 'केदारनाथ' या चित्रपटात तो सारा अली खान हिच्यासोबत दिसला होता. 

सुशांत याची माजी व्यवस्थापिका दिशा सॅलियन हिने 8 जूनला आत्महत्या केली होती. ती ऐश्वर्या रॉय, भारती सिंह आणि वरुण शर्मा या सेलेब्रिटींचा व्यवस्थापिका होती. आता सुशांत याने आत्महत्या केल्याने याचा संबंध दिशा हिच्या आत्महत्येशी आहे का, हे पोलिस पडताळून पाहत आहेत. दिशा हिच्या मृत्यूनंतर सुशांत याने सोशल मीडियावर म्हटले होते की, ही अतिशय दु:खद बातमी आहे. मी दिशा आणि तिच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहे. ईश्वर तिच्या आत्म्यास शांती देवो. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com