पंतप्रधान घेणार कोरोना स्थितीचा आढावा; मुख्यमंत्र्यांबरोबर आज बैठक

करोना संक्रमणाची दुसरी लाट येण्याची शक्‍यता वर्तवली जात असल्याने राज्य सरकारने मिशन बिगेन अगेनला थांबा दाखवला आहे. करोनाचे संक्रमण वाढलेल्या दिल्ली, राजस्थान, गुजरात आणि गोवा या राज्यांमधून येणाऱ्या प्रवाशांना तास अगोदर केलेला करोना चाचणीचा अहवाल सोबत घेऊनच महाराष्ट्रात येता येणार आहे
Narendra Modi
Narendra Modi

मुंबई : करोना संक्रमणाची दुसरी लाट येण्याची शक्‍यता वर्तवली जात असल्याने राज्य सरकारने मिशन बिगेन अगेनला थांबा दाखवला आहे. करोनाचे संक्रमण वाढलेल्या दिल्ली, राजस्थान, गुजरात आणि गोवा या राज्यांमधून येणाऱ्या प्रवाशांना तास अगोदर केलेला करोना चाचणीचा अहवाल सोबत घेऊनच महाराष्ट्रात येता येणार आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली आहे, त्यानंतर पुढील दिशा स्पष्ट होणार आहे. 

रेल्वे स्थानक, विमानतळ आणि टोल नाक्‍यांवर अहवाल तपासणी केली जाणार आहे. तपासणी अहवाल नसणार्या प्रवाशांची आरटी पीसीआर किंवा अँन्टीजन टेस्ट केली जाणार आहे. या राज्यांमधून येणाऱ्या प्रवाशांकडे कोवीड चाचणीचा ताजा अहवाल नसेल तर ती ताबडतोब विमानतळ, रेल्वे स्थानक आणि टोल नाक्‍यांवर केली जाणार आहे, त्यासाठी प्रवाशांना पैसे मोजावे लागणार आहेत. तसेच पॉझेटिव्ह असणार्या प्रवाशांना कोवीड केअर सेंटरमध्ये दाखल होण्यासाठी पैसे घेतले जाणार आहेत. राज्य सरकारने याबाबतचे आदेश दिले आहेत.

दिल्लीसह अनेक राज्यात करोनाची दुसरी लाट आली आहे. दिल्लीसोबतच राजस्थान, गुजरात आणि गोव्यात कोरोनाचे संक्रमण वाढत असल्याने राज्य सरकारने खबरदारी घेण्यास सुरूवात केली आहे. मागील दोन महिन्यात टप्याटप्याने लॉकडाऊन मधून राज्य बाहेर येत असतानाच पुन्हा धोक्‍याची घंटा वाजू लागली आहे. शिवाय राज्यातील कोरोन रुग्णांचा वाढत्या आकड्याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील चिंता व्यक्त केली असून येत्या काही दिवसात काही निर्बंध पुन्हा घातले जाण्याची शक्‍यता आहे.

दरम्यान, राज्य सरकारने आज मिशिन बिगेन अगेनमध्ये दिल्ली, राजस्थान, गुजरात आणि गोवा या राज्यातून येणार्या प्रवाशांकडे कोवीड टेस्टचा ताजा चाचणी अहवाल असणे आवश्‍यक केले आहे. विमान प्राधिकरणाने देखील महारष्ट्रात येणार्या प्रवाशांचा अहवाल तपासून त्यांना विमानात प्रवेश द्यावा असेही या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. तरीही ही तपासणी न केलेले प्रवासी राज्यातील विमानतळावर आले तर त्यांची सक्तीने आरटी पीसीआर तपासणी प्रवाशांच्या खर्चाने केली जाणार आहे. कोणतीही लक्षणे नसणार्या प्रवाशांना त्यांच्या पुढील प्रवासाची, निवासाची नोंद करून त्यांना सोडले जाणार आहे. मात्र त्यांचा चाचणी अहवाल येईपर्यंत त्यांना त्यांचे निवासस्थान सोडता येणार नाही. पॉझिटिव्ह रुग्णांना महापालिकेच्या नियमानुसार रुग्णालय किंवा क्वॉरंटाईन सेंटर मध्ये दाखल व्हावे लागणार आहे.

या चारही राज्यांमधून रेल्वेने येणार्या प्रवाशांना देखील आरटी पीसीआर चाचणी प्रवास सुरू करण्यापूर्वी तास अगोदर करणे आवश्‍यक आहे. ही चाचणी पॉझेटिव्ह असेल मात्र रुग्णाला कोणतीही लक्षणे नसतील तर त्यांना घरी जाता येणार आहे. स्थानिक महापालिकेच्या नियमांचे पालन त्यांना करावे लागणार आहे. परंतु चाचणी अजिबात न केलेल्या किंवा ज्यांना लक्षणे आहेत अशा प्रवाशांची अँन्टीजेन चाचणी प्रवाशांच्या खर्चाने केली जाणार आहे. पॉझेटिव्ह असणाऱ्या प्रवाशांना कोवीड केअर सेंटरमधला खर्च स्वतः करावा लागणार आहे. निगेटीव्ह असणाऱ्या रुग्णांना घरी जाता येणार आहे.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com