नीलेश राणेंचे आमदार संजय गायकवाडांना त्याच भाषेत उत्तर

आमदार नीतेश राणे यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत गायकवाड यांच्यावर टीकाकेली आहे.
Nilesh Rane criticizes Sanjay Gaikwad for making controversial remarks about Devendra Fadnavis
Nilesh Rane criticizes Sanjay Gaikwad for making controversial remarks about Devendra Fadnavis

मुंबई  ः मला जर कोरोनाचे जंतू सापडले असते, तर मी ते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोंबून टाकले असते, असे वादग्रस्त वक्तव्य शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केले आहे. या व्यक्तव्यावरून भाजपचे कार्यकर्ते आक्रम झाले असून गायकवाड यांना धडा शिकवण्याची भाषा त्यांच्याकडून केली जात आहे. दुसरीकडे  भाजप नेत्यांकडून गायकवाड यांचा शेलक्या शब्दांत समाचार घेतला जात आहे. आमदार नीतेश राणे यांनीही आपल्या नेहमीच्या शैलीत गायकवाड यांच्यावर टीका करत मुख्यमंत्र्यांवरही निशाणा साधला आहे.


आमदार नीतेश राणे यांनी ट्विट करत शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांना इशारा दिला आहे. ट्विटमध्ये राणे यांनी म्हटले आहे की,  देवेंद्रजींच्या जवळ जाणे हे तर लांबच राहिले.. हे या गायकवाडला कोण सांगेल....पहिला प्रयोग तुझ्या घरकोंबडा मुख्यमंत्र्यांवर कर आणि मग बाकीचे बघू... जंतू पार्सल पाठवतो मातोश्रीवर..अशा शब्दांत त्यांनी गायकवाड यांचा समाचार घेतला आहे. 

काय म्हणाले होते आमदार संजय गायकवाड ?
  
मला जर कोरोनाचे जंतू सापडले असते, तर मी ते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोंबून टाकले असते. फडणवीस यांनी कोरोनावरुन राजकारण करु नये, असे व्यक्तव्य आमदार संजय गायकवाड यांनी बुलडाण्यात केले होते. 

फक्त राज्यात नव्हे तर संपूर्ण देशभर कोरोनामुळे हाहाकार उडाला आहे. भारतीय जनता पक्ष यावेळी मदत करायचे सोडून राजकारण करत आहे, असा आरोपही गायकवाड यांनी केला होता. तसेच त्यांनी एकेरी भाषेचा वापर करत देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि प्रवीण दरेकर यांचाही खरपूस समाचार घेतला होता.
 
महाराष्ट्रात कोरोना साथीचा कहर सुरु आहे. या संकट काळात केंद्रातले नरेंद्र मोदी सरकार सहकार्य करण्याऐवजी उलट कोंडी करत आहे. तर महाराष्ट्रातील भाजपची मंडळी खिल्ली उडवीत आहे. भाजपच्या लोकांचे नीच राजकारण उभा महाराष्ट्र पाहत आहे. राज्य सरकारला मदत करायचे सोडून बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळला मदत केली आहे. गुजरातला रेमडेसिव्हिर इंजेक्शन मोफत वाटले. कोरोना काळात कोणीच राजकारण करु नये, असे आव्हानही त्यांनी केले होते. 

जर का माणसेच जिवंत राहिली नाही तर तुम्हाला मतदान कोण करणार असा प्रश्न तुम्ही सरकारला विचारत आहात. त्याशिवाय तुम्ही तर सरकार पाडायला निघाले आहात. मात्र अगोदर माणसे जिवंत ठेवा, मगच राजकारण करा, असे आवाहनही त्यांनी भाजपला केले आहे. ज्याचा घरातील माणूस कोरोनाने मरतो त्यालाच माहित की कोरोना काय आहे. मात्र भाजपवाल्यांना याची जाण नाही,असेही ते म्हणाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com