सभापती रामराजेंनी ही खंत व्यक्त करत विधान परिषद केली तहकूब 

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी किमान अर्धा तास चर्चा वा लक्षवेधीचे कामकाज आपल्या अधिकारात घेण्याची विनंती सभापतींना केली होती.
Legislative Council Speaker Ramraje Naik Nimbalkar laments lack of seriousness in discussion on condolence motion
Legislative Council Speaker Ramraje Naik Nimbalkar laments lack of seriousness in discussion on condolence motion

पिंपरी : शोकप्रस्तावावरील चर्चेत गांभीर्य राखले जात नसल्याची खंत विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी आज (ता. 1 मार्च) व्यक्त केली. त्यामुळे सदस्य निधनावरील शोकप्रस्ताव त्यांनी भाषणाविना मंजूर करीत सभागृहाचे कामकाज उद्यापर्यंत (ता. 2 मार्च) तहकूब केले. त्यासाठी शोकप्रस्तावावर भाषण न करण्याचा लोकसभेचा दाखलाही त्यांनी दिला. 

सभापतीच नाही, तर आमदार म्हणूनही आपण अनेक शोकप्रस्ताव पाहिले. पण, त्यावरील चर्चेत त्याचे गांभीर्य ठेवले जात नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे आज तो विनाचर्चा मंजूर करीत आहे, असे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले. त्यामुळे अनंत तरे आणि म. गो. वैद्य या सदस्यांच्या निधनाच्या शोक प्रस्तावावर भाषणे न होता तो सभापती नाईक निंबाळकर यांनी मंजूर करीत सभागृहाचे कामकाज उद्यापर्यंत स्थगित करत असल्याचे जाहीर केले. 

उद्या (मंगळवारी, ता. 2 मार्च) व परवा (बुधवारी, ता. 3 मार्च) राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांच्या अभिभाषणावर सभागृहात चर्चा होणार आहे. तत्पूर्वी नवनिर्वाचित सदस्य अभिजित वंजारी यांचा परिचय करून देण्यात आला. राज्यपालांच्या अभिभाषणावरील त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव सभागृहात मांडण्यात येऊन तो संमत करण्यात आला. तसेच, राज्यपालांनी संमत केलेल्या आठ विधेयकांची नावेही वाचून दाखवण्यात आली. 

सभापती तालिकेवरील तीन सदस्यांच्या नावांची घोषणाही सभापतींनी केली. दरम्यान, सभापतींनी शोकप्रस्तावाचे वाचन सुरु करण्यापूर्वी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी किमान अर्धा तास चर्चा वा लक्षवेधीचे कामकाज आपल्या अधिकारात घेण्याची विनंती सभापतींना केली होती. 

हेही वाचा : अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अजित पवार अन्‌ फडणवीसांमध्ये जुंपली 

मुंबई : विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून (ता. 1 मार्च) मुंबईत सुरू झाले. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष पाहायला मिळाला. वैधानिक विकास महामंडळाच्या पुनर्स्थापनेचा विषय विधिमंडळात गाजला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वैधानिक विकास महामंडळावरून सरकारला घेरले. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि फडणवीस यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. 

वैधानिक विकास महामंडळाची पुर्नस्थापना का केली नाही? यावर सरकार निर्णय का घेत नाही? असे प्रश्न मुनगंटीवार यांनी या वेळी उपस्थित केले. त्यावर अजित पवारांनी राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांच्याकडून सुरु असलेल्या सरकारच्या अडवणुकीकडे लक्ष वेधले. विकास महामंडळ आम्ही स्थापन करू. बजेटमध्ये मी तसा निधीही देईन. ज्या दिवशी राज्यपाल बारा आमदारांची नावे जाहीर करतील, त्याच दिवशी आम्ही वैधानिक विकास मंडळ घोषित करू, असे पवार म्हणाले. 

अजित पवार यांनी राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा विषय उपस्थित करताच फडणवीस यांनी आक्रमक पवित्रा घेतला. दादांच्या पोटातले आता ओठांवर आले. बारा आमदारांसाठी मराठवाडा, विदर्भातील कोट्यवधी लोकांना ओलीस धरता का? असा सवाल फडणवीसांनी केला. आम्ही जे मागत आहोत, ते आमच्या हक्काचे आहे. तुम्ही आम्हाला भीक देत नाही. तुम्ही देणार नसाल, तर आम्ही भांडून मिळवू, अशा शब्दांत फडणवीस यांनी पवारांना उत्तर दिले.

आमचे म्हणणे ऐकले जात नसेल तर आम्ही एक मिनिटसुद्धा सभागृहात बसणार नाही. कामकाज रेटून न्यायचे असेल तर आम्हाला बसवता कशाला? अशा शब्दांत फडणवीसांनी हल्लाबोल केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com