दीपक केसरकर म्हणतात....मी मंत्रीपदासाठी लाचार नाही

आता माझी मंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्‍यता नाही आणि त्यासाठी मी लाचार होणार नाही. मला मिळालेल्या संधीतून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी दिशा दाखवली आहे. मी नगराध्यक्ष नसलो तरी शहराच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. त्यामुळे मी जो नगराध्यक्ष पदाचा उमेदवार देईन, त्याच्या पाठीशी शहरातील जनतेने उभे राहणे गरजेचे आहे, असे आमदार दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
Deepak Kesarkar
Deepak Kesarkar

सावंतवाडी : आता माझी मंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्‍यता नाही आणि त्यासाठी मी लाचार होणार नाही. मला मिळालेल्या संधीतून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी दिशा दाखवली आहे. मी नगराध्यक्ष नसलो तरी शहराच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. त्यामुळे मी जो नगराध्यक्ष पदाचा उमेदवार देईन, त्याच्या पाठीशी शहरातील जनतेने उभे राहणे गरजेचे आहे, असे आमदार दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

श्री. केसरकर म्हणाले, ""सावंतवाडी शहराच्या विकासासाठी मी कटिबद्ध आहे. पालकमंत्री असताना जिल्हा नियोजन मंडळ, शासन स्तरावरून निधी दिला. त्याची नुकतीच उद्घाटने झालेली आहेत. येथील पालिकेला जिल्हा नियोजनमधून निधी दिला त्याचे श्रेय दुसरे लोक घेत आहेत; मात्र सावंतवाडीकर जनतेला माहिती आहे. मी नगराध्यक्ष असो किंवा नसो शहराच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. ही जनता जाणून आहे.''

ते म्हणाले, "शहरवासियांना चोवीस तास पाणी मिळावे, म्हणून ४६ कोटीची योजना प्रस्तावित आहे. त्या योजनेचा पाठपुरावा मी केला आहे. अन्य कोणी पाठपुरावा केला असेल तर तसे पत्र दाखवावे. शहराच्या विकासासाठी मी सतत निधी दिलेला आहे. आम्हीच केलं असे म्हणणाऱ्यांनी नळपाणी योजनेसाठी एक तरी प्रत पत्र दिले असेल तर दाखवावे.''

"येथील संत गाडगेबाबा मंडईसाठी पाच कोटींचा रुपयांचा निधी खर्च झाला नसल्याने तो परत गेला आहे. जिल्हा नियोजन मंडळ आणि शासनस्तरावरून साडेसात कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे. जिल्हा नगरोत्थानमधून अडीच कोटी रुपये मंजूर झाला असून पाच कोटी रूपये नगरविकास खात्याकडून मंजूर होणार आहे. आडाळी एमआयडीसीमध्ये प्रकल्प आणणे, वाफोली येथील प्रकल्प सुरू करणे आणि सावंतवाडी येथील सेटबॉक्‍स निर्माण करणाऱ्या प्रकल्प सुरू करण्यावर माझा भर असेल.'' असेही केसरकर म्हणाले.

भाताचे उत्पादन वाढले
चांदा ते बांदा योजनेमुळे भाताचे उत्पादन वाढले आहे. असे चांगले नियोजन केल्यानंतर निश्‍चितच शेतकऱ्यांना फायदा होईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोकणच्या विकासासाठी कटिबद्ध आहेत. ती संधी साधून सिंधुदुर्गच्या विकासासाठी पुढील काळामध्ये आपले प्रयत्न राहतील. कोरोनाच्या काळामध्ये महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले असून अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. आता तरी कोरोना संकटाला सामोरे जाताना राजकारण आणि थट्टामस्करी थांबवली पाहिजे, असेही श्री. केसरकर यांनी सांगितले.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com