आपण राजा नाही हे पंतप्रधान विसरले - बच्चू कडू

शेतकऱ्यांच्या आंदोलनात सर्व पक्ष सहभागी होत आहेत याचा आनंद आहे. सरकारने अजूनपर्यंत कोणताही निर्णय न घेतल्याने हे आंदोलन राज्यभर पेटणार आहे, असे मत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी व्यक्त केले आहे.
Bacchu Kadu- Narendra Modi
Bacchu Kadu- Narendra Modi

अमरावती : देशातली प्रजा ही राजासारखी असायला हवी. पण आपण राजा नाही प्रजा आहोत, हे देशाचे पंतप्रधान व त्यांचे सरकार विसरले आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनात सर्व पक्ष सहभागी होत आहेत याचा आनंद आहे. सरकारने अजूनपर्यंत कोणताही निर्णय न घेतल्याने हे आंदोलन राज्यभर पेटणार आहे, असे मत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी व्यक्त केले आहे.

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाविकास आघाडी सरकारतर्फे आज मुंबईच्या आझाद मैदानापासून मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यभरातील शेतकरी या आंदोलनात सहभागी होण्यासाठी मुंबईत दाखल झाले आहेत. दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी  तीन दिवसापासून मुंबईत आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, महाविकास आघाडीचे नेते आजच्या आंदोलनात सहभागी होणार आहेत.  त्या पार्श्वभूमीवर बच्चू कडू बोलत होते. 

ते म्हणाले, "प्रजासत्ताक दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून आम्हाला अपेक्षा आहे की देशातील बळीराजाने ज्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत त्यांच्या बाजून हा निर्णय व्हायला हवा.  अन्यथा येत्या काळात शेतकऱ्यांचं उग्र स्वरूप पाहायला मिळू शकते.  दिल्ली मध्ये गेल्या ५५ दिवसांपासून पंजाब हरियाणा चे शेतकरी कृषी कायदा रद्द करण्याकरीता जे आंदोलन करीत आहेत ते अतिशय चांगल्या पदतीने रेटून धरले आहे. केंद्र सरकार कडून शेतकऱ्यांना अपेक्षा होत्या. मात्र सरकारने अजून पर्यंत कोणताही निर्यण न घेतल्यामुळे हे आंदोलन  पेटणार आहे. मुंबई मधील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सर्व पक्षीय नेते सहभागी होत आहेत, हा शेतकऱ्यांचा विजय आहे.  राज्यपालांनी या आंदोलनाची दखल घेऊन राष्ट्र्पतींना याबाबत माहिती द्यावी व यावर काही निर्णय घ्यावा,'' 

दरम्यान, केंद्र सरकारने केलेल्या कृषीविषयक कायद्याच्या निषेधार्थ नाशिकहून निघालेला हजारो शेतकऱ्यांचा मोर्चा मुंबईतील आझाद मैदानात काल धडकला. अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वात निघालेल्या या मोर्चाद्वारे कृषी कायद्याविरोधात दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा दिला जाणार आहे. २६ जानेवारीला आझाद मैदान येथे प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात येणार आहे. त्यानंतर मागण्यांचे निवेदन राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांना देण्यात येणार आहे. 
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com