आसाम वगळता चार राज्यांत भाजपचा पराभव निश्चित : शरद पवार

पश्चिम बंगालमध्ये भाजप व केंद्र सरकार सत्तेचा गैरवापर करुन ममता बॅनर्जी यांच्यावर राजकीय हल्ला करण्याची भूमिका घेतली आहे, बंगाली संस्कृती व तेथील लोकांचे मन या वर आघात करण्याचा प्रयत्न कुणी केला, तर राज्य एकसंघ होते व तशी प्रतिक्रीया मतांतून व्यक्त होते. त्यामुळे कुणालाही काहीही म्हणू दे, पण पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचीच सत्ता येईल याची मला खात्री आहे, असे ज्येष्ठ नेते शरद पवार बारामती येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
Sharad Pawar
Sharad Pawar

बारामती : आगामी पाच राज्यातील निवडणूकीत आसाम वगळता इतर राज्यात भाजपचा पराभव होईल असा अंदाज ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केला. आहे. भाजपचा हा  पराभव देशाला नवीन दिशा देणारा ठरेल, अशी मला खात्री वाटते, अशा शब्दात पाच राज्यातील निवडणुकीनंतर देशातील राजकीय गणिते बदलतील, असाही अंदाज त्यांनी व्यक्त केला.

बारामतीतील गोविंदबाग निवासस्थानी ते पत्रकारांशी  पाच राज्यातील निवडणूकीबाबत बोलताना पवार म्हणाले, "पश्चिम बंगालमध्ये भाजप व केंद्र सरकार सत्तेचा गैरवापर करुन ममता बॅनर्जी यांच्यावर राजकीय हल्ला करण्याची भूमिका घेतली आहे, बंगाली संस्कृती व तेथील लोकांचे मन या वर आघात करण्याचा प्रयत्न कुणी केला, तर राज्य एकसंघ होते व तशी प्रतिक्रीया मतांतून व्यक्त होते. त्यामुळे कुणालाही काहीही म्हणू दे, पण पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचीच सत्ता येईल याची मला खात्री आहे,"

ते पुढे म्हणाले की, केरळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस डाव्यांच्या सोबत असून त्यांना निर्विवाद बहुमत मिळेल. तामिळनाडूमध्ये आज लोकांच कल डीएमके च्या म्हणजेच स्टॅलिन यांच्या बाजूने आहे. स्टॅलिन हे तमिळनाडूची सूत्रे हाती घेतील व लोक त्यांना पाठिंबा देतील, आसाममध्ये भाजपची स्थिती तुलनात्मक चांगली आहे तेथे त्यांचा विजय होईल, असा अंदाज पवार यांनी व्यक्त केला. "शेतकरी आंदोलनासंदर्भात सरकारने समंजसपणाची भूमिका न घेतल्याने लोकसभा व राज्यसभाही चालू शकली नाही, या बाबत उद्याच्या अधिवेशनात काय होते ते पाहू या, पण या प्रश्नावर शेतकरी जसे अस्वस्थ आहेत तशीच संसदही अस्वस्थ आहे त्या मुळे उद्या या बाबत काही प्रतिक्रीया उमटू शकते असे कुणी म्हटले तर ते चुकीचे नाही," असेही पवार म्हणले.

भाजपचे खासदार साक्षी महाराजांनी शेतक-यांना खलिस्तानवादी म्हणाले होते. त्यावर विचारले असता पवार म्हणाले, ''बेजबाबदारपणे बोलण्यासंदर्भात काही लोकांचे वैशिष्टय असते. असे लोक शेतक-यांना दहशतवादी, खलिस्तानवादी संबोधत असतील तर अशा लोकांना काय महत्व द्यायचे? अशा लोकांना आपण महत्व न देणे हेच त्यांना उत्तर आहे.,'' सचिन वाझे यांच्या अटकेबाबत विचारले असता, हा लहान प्रश्न आहे, ही बाब म्हणजे काही राज्याचे धोरण नव्हे, असे म्हणत त्यांनी यावर भाष्य केले नाही. 

शेतकऱ्यांना नुकसानभरपाईबाबत बोलताना ते म्हणाले, "कधी नव्हे इतके महाराष्ट्र आज आर्थिकदृष्टया अडचणीत आहे, पण यातूनही राज्य सरकार निश्चितपणे काहीतरी मार्ग काढेल अशी मला खात्री वाटते,'' असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला. 

बारा आमदारांच्या नियुक्तीबाबत राज्यपालांनी अजूनही निर्णय घेतला नाही, या बाबत विचारता पवार म्हणाले, "मंत्रीमंडळाने जे निर्णय घेतले आहे, त्याची अंमलबजावणी करण्याचे काम राज्यपालांचे असते, घटनेने मंत्रीमंडळाला निर्णय घेण्याचे अधिकार दिलेले आहेत, लोकशाही व घटना न पाळणारे राज्यपाल महाराष्ट्राने या पूर्वी कधीही पाहिले नाही, हा चमत्कार सध्याच्या राज्यपालांनी केलेला आहे, ही दुर्देवाची गोष्ट आहे, या बाबत केंद्र सरकार बघ्याची भूमिका घेत आहे ही गोष्ट चिंताजनक आहे. वास्तविक नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना त्यांना राज्यपालांकडून अडवणूकीचा अनुभव आलेला  असतानाही आज महाराष्ट्राबाबत काही निर्णय होत नाही," बघ्याची भूमिका केंद्र घेतेय या बाबत पवार यांनी अप्रत्यक्षपणे नरेंद्र मोदी यांच्यावरच निशाणा साधला.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com