सध्या राज्यात सध्या राजकीय उलथापालथ होणे अशक्‍य : एकनाथ खडसे

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या राजकीय घडामोडी मोठ्या प्रमाणात घडत असून राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांच्याकडे राजकीय नेत्यांच्या भेटी वाढल्या आहेत. तसेच पडद्यामागून राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे. विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त सदस्यांचा मुद्दा, त्यानंतर झालेली निवडणूक, यादरम्यान शिवसेनानेते संजय राऊत यांनी राज्यपालांवर केलेली टीका, कोरोनाचा राज्यातील उद्रेक या सर्व बाबींची सध्याच्या राजकीय स्थितीला पार्श्‍वभूमी आहे
No Political Turbulence in Maharashtra in Near Future Claims Eknath Khadse
No Political Turbulence in Maharashtra in Near Future Claims Eknath Khadse

जळगाव : सद्य:स्थितीत राज्यपालांकडे राजकीय नेत्यांच्या वाढलेल्या भेटीगाठी गतिमान झाल्यामुळे सर्वांचे लक्ष राजभवनाकडे लागले आहे. त्यातून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी राजकीय पालथापालथ होण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. मात्र, कोरोनाचे संकट गडद होत आहे, त्यामुळे अशा स्थितीत कोणत्याही प्रकारची राजकीय उलथापालथ होणे अशक्‍य आहे, असे मत भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथ खडसेंनी व्यक्त केले.

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या राजकीय घडामोडी मोठ्या प्रमाणात घडत असून राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांच्याकडे राजकीय नेत्यांच्या भेटी वाढल्या आहेत. तसेच पडद्यामागून राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे. विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त सदस्यांचा मुद्दा, त्यानंतर झालेली निवडणूक, यादरम्यान शिवसेनानेते संजय राऊत यांनी राज्यपालांवर केलेली टीका, कोरोनाचा राज्यातील उद्रेक या सर्व बाबींची सध्याच्या राजकीय स्थितीला पार्श्‍वभूमी आहे. अलीकडेच संजय राऊत, शरद पवार, नारायण राणे यांनी राज्यपालांची भेट घेतली. पवारांनी मातोश्रीवर हजेरी लावत उद्धव ठाकरेंशीही चर्चा केली. त्यामुळे राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

राज्यपालांच्या भेटींचा राजकीय अर्थ काढणे गैर

याबाबत ज्येष्ठ नेते खडसेंशी संपर्क साधला असता ते म्हणाले, राजकीय नेत्यांनी काही कारणांच्या निमित्ताने राज्यपालांची भेट घेण्यात गैर काही नाही. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची व राज्यपालांची भेट त्यादृष्टीने असू शकेल. त्यातून राजकीय अर्थ काढणे योग्य ठरणार नाही. आघाडी सरकारमधील कोणत्याही एका पक्षाने ठरविल्याशिवाय या सरकारला धोका निर्माण होण्याचे कारण नाही. त्यामुळे या काळात राजकीय उलथापालथ होईल, याची शक्‍यता जवळपास शून्य टक्के आहे.

राजकारणापेक्षा कोरोनाचा विचार व्हावा

अशावेळी सर्वांनी राजकारण करण्यापेक्षा आता वाढत्या कोरोनावर नियंत्रण कसे मिळावे यासाठी विचार केला पाहिजे. विरोधी पक्ष म्हणून आमची हेच म्हणणे आहे की कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी सरकारतेने गंभीर लक्ष घालावे. सध्याची स्थिती चिंताजनक आहे. त्यामुळे सरकारने आणखी काही कठोर पावले उचलून कोरोनावर नियंत्रणासाठी प्रयत्न केले पाहिजे. विरोधी पक्ष म्हणून आमचे सहकार्य करेल, असे मत खडसेंनी मांडले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com