तीन कोटी नागरिकांनी घेतला शिवभोजनाचा आस्वाद

महाविकास आघाडी सरकारचा महत्वकांक्षी कार्यक्रम असलेली शिवभोजन योजना सुरू करण्यात आली. राज्यात २६ जानेवारी २०२० ते २० जानेवारी २०२१ या कालावधीत तीन कोटी नागरिकांनी शिवभोजन थाळीचा आस्वाद घेतला.
Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal

नाशिक : राज्यातील गोरगरीब, शेतकरी, मजूर व विद्यार्थी वर्ग उपाशी राहू नये यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार  महाविकास आघाडी सरकारचा महत्वकांक्षी कार्यक्रम असलेली शिवभोजन योजना सुरू करण्यात आली. राज्यात २६ जानेवारी  २०२० ते २० जानेवारी २०२१ या कालावधीत तीन कोटी नागरिकांनी शिवभोजन थाळीचा आस्वाद घेतल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. 

ते म्हणाले, महाविकास आघाडी सरकारने ही महत्वकांक्षी योजना सुरू केली. राज्यात २६ जानेवारी या महत्त्वकांक्षी योजनेचा प्रारंभ झाला. त्यानुसार दहा रुपयांत राज्यातील गरजु व गरीब नागरिकांना शिवभोजन थाळी उपलब्ध करून देण्यात आली. कोरोना  प्रादुर्भावाच्या काळात राज्यात कोणीही उपाशी राहू नये यासाठी केवळ ५ रुपयांमध्ये जेवण देण्याचा महत्वकांक्षी निर्णय झाला. ही सवलत जूनपर्यंत होती. मात्र अद्यापही कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला नसल्याने  मार्च २०२१  पर्यंत त्याला मुदतवाढ देण्यात आली.

कष्टकरी, असंघटित कामगार, स्थलांतरित, बाहेरगावचे विद्यार्थी, रस्त्यावरील बेघर इत्यादी नागरिकांच्या हाल-अपेष्टा होत असल्याने शिवभोजन थाळी योजनेचा एप्रिल पासून तालुकास्तरावर विस्तार करण्यात आला.  प्रत्येक जिल्ह्यात देण्यात आलेल्या शिवभोजन थाळीच्या संख्येत पाचपट वाढ करण्यात आली आहे. त्याच्या वेळेत वाढ करण्यात आली. सकाळी ११  ते ३  या वेळेत भोजन उपलब्ध असते. शासन शहरी भागात प्रती थाळी ४५ रुपये आणि ग्रामीण भागासाठी प्रती थाळी ३० रुपये अनुदान देते. राज्यात सुरू असलेल्या उद्दिष्टामध्ये वाढ करून अधिक अधिक लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न आहे असे  श्री. भुजबळ यांनी सांगतिले. 

शासनाने शिवभोजन योजना सुरु केल्यानंतर जानेवारी महिन्यात ७९ हजार ९१८, फेब्रुवारी महिन्यात ४ लाख ६७ हजार ८६९, मार्च महिन्यात ५ लाख ७८ हजार ३१ नागरिकांनी आस्वाद घेतला. त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने घोषित केलेल्या लॉकडाऊन मधील एप्रिल, मे आणि जून या महिन्यात अनुक्रमे २४ लाख ९९ हजार २५७, ३३ लाख ८४ हजार ०४०, ३० लाख ९६ हजार २३२ इतक्या लोकांनी शिवभोजन थाळीचा आस्वाद घेतला.

लॉकडाऊननंतरच्या काळात जुलै महिन्यात ३० लाख ३ हजार ४७४, ऑगस्ट महिन्यात ३० लाख ६० हजार ३१९, सप्टेंबर महिन्यात ३० लाख ५९ हजार १७६,ऑक्टोबर ३१ लाख ४५ हजार ०६३, नोव्हेंबर २८ लाख ९६ हजार १३०, डिसेंबर मध्ये २८ लाख ६५ हजार ९४३ तर आज २० जानेवारी २०२१ पर्यंत १९ लाख २६ हजार ०५४  गरजू नागरिकांनी शिवभोजन थाळीचा आस्वाद घेतला असून आज शिवभोजन थाळी वाटपाचा विक्रम झाला असून आजपर्यंत तब्बल तीन कोटी नागरिकांनी शिवभोजन थाळीचा आस्वाद घेतला आहे.
...
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com