आठवले म्हणतात, 'आरक्षणाबाबतचा 'हा' निर्णय बदला...'  

दिव्यांगांना शिक्षणात 4 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. हा निर्णय दिव्यांगावर अन्याय करणारा आहे. त्यांना शिक्षणात 5 टक्के आरक्षण द्यावे, असे रामदास आठवले यांनी सांगितले.
2Mum_Ramdas_Athavle_Smaller_.
2Mum_Ramdas_Athavle_Smaller_.

मुंबई : केंद्र सरकारने दिव्यांगाना शिक्षणात 5 टक्के आरक्षण देण्याचा कायदा केला आहे. मात्र, महाराष्ट्र सरकारने दिव्यांगांना शिक्षणात 4 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. हा निर्णय दिव्यांगावर अन्याय करणारा आहे. राज्य सरकारने हा निर्णय त्वरीत बदलावा. त्यांना शिक्षणात 5 टक्के आरक्षण द्यावे, असे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी सांगितले. 

महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी याबाबत त्वरित केंद्राच्या निर्णयाशी सुसंगत निर्णय घेऊन महाराष्ट्रातील दिव्यांगाना न्याय द्यावा, असे रामदास आठवले यांनी सांगितले. दिव्यांग विद्यार्थ्यांना यापूर्वी शिक्षणात 4 टक्के आणि नोकरीमध्ये 3 टक्के आरक्षण होते. मात्र, प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात दिव्यांग विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयामार्फत त्यांना शिक्षणात 4 टक्क्यांहून 5 टक्के आणि नोकरीमध्ये 3 टक्क्यांहुन 4 टक्के आरक्षण वाढ करण्याचा निर्णय घेत संसदेत कायदा मंजूर केला आहे. त्यानुसार महाराष्ट्र्र राज्य सरकारने त्यांना शिक्षणात 5 टक्के आणि नोकरी मध्ये 4 टक्के आरक्षणाचा निर्णय घ्यावा, असे आठवले यांनी नमूद केले आहे.


हेही वाचा : संजीवराजेंच्या आमदरकीसाठी रामराजेंचे पवारांना साकडे 
 
सातारा : राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या जागेवर राष्ट्रवादीकडून सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांची वर्णी लावावा, यासाठी मागणी फलटण तालुक्‍यातून जोर धरू लागली आहे. या पार्श्‍वभूमीवर विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी आज साताऱ्यातील विश्रामगृहात खासदार शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी श्री. रामराजे यांच्यासमवेत संजीवराजे नाईक निंबाळकर, रघुनाथराजे नाईक निंबाळकर ही उपस्थित होते. प्रथमच या तिघ बंधूंनी शरद पवारांची भेट घेतल्यामुळे राष्ट्रवादीतील काहींच्या भुवया उंचावल्या आहेत. विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त आमदारांच्या 12 जागा रिक्त आहेत.

या जागांवर आपल्याच पक्षातील कोणाची तरी वर्णी लागावी, यासाठी प्रत्येक पक्षाचा नेता प्रयत्न करत आहे. प्रत्येक पक्ष आपापल्या पक्षातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या नेत्याची वर्णी लावण्यासाठी धडपडत आहे. राष्ट्रवादीने आतापर्यंत त्यांच्या कोट्यातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. तर साताऱ्यातून फलटणचे संजीवराजे नाईक निंबाळकर यांना विधान परिषदेवर घेण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com