मुंबई : लॉकडाऊन कालावधीत परराज्यातील स्थलांतरीत मजुरांना त्यांच्या राज्यात पाठवण्यासाठी तसेच इतर राज्यात महाराष्ट्रातील स्थलांतरीत कामगार, मजुर अडकले आहेत. त्यांना पुन्हा महाराष्ट्रात आणण्यासाठी अशा मजुरांच्या श्रमिक रेल्वे तिकिटाचे शुल्क मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून भरण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली होती. त्यानुसार या 36 जिल्ह्यांना 54 कोटी 75 लाख 47 हजार 70 रुपयांचा निधी देण्यात आला असून तो संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आला आहे.
कोविड 19 च्या साथीमुळे लॉकडाऊन जाहीर झाले आणि महाराष्ट्रात इतर राज्यातील कामगार आणि मजुर अडकले. तसेच महाराष्ट्रातील कामगार आणि स्थलांतरीत मजुरही इतर राज्यांमध्ये अडकले आहेत. त्यांना या निर्णयाने मोठा दिलासा मिळेल. सचिव आपत्ती व्यवस्थापन व मदत व पुनर्वसन विभाग यांनी दिलेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या यादीप्रमाणे मुख्यमंत्री सहाय्यता निधीतील रकमांचे अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे. या निधीचा वापर केवळ ज्या कारणासाठी वितरित करण्यात आला आहे त्यासाठीच करता येणार आहे हे ही स्पष्ट करण्यात आले आहे.
जिल्ह्यांना देण्यात आलेला निधी असा:
1 मुंबई शहर 12,96,00,000
2 मुंबई उपनगर 10,00,00,000
3 ठाणे 4,80,00,000
4 रायगड 2,50,00,000
5 रत्नागिरी 1,50,00,000
6 पालघर 3,00,00,000
7 सिंधुदूर्ग 1,00,00,000
8 नाशिक 40,00,000
9 धुळे 25,00,000
10 नंदुरबार 25,00,000
11 जळगांव 20,00,000
12 अहमदनगर 20,00,000
13 पुणे 8,00,00,000
14 सातारा 95,81,270
15 सांगली 30,00,000
16 सोलापूर 50,00,000
17 कोल्हापूर 1,25,91,400
18 औरंगाबाद 80,00,000
19 जालना 50,00,000
20 बीड 30,00,000
21 परभणी 50,00,000
22 हिंगोली 6,00,000
23 नांदेड 20,00,000
24 उस्मानाबाद 20,00,000
25 लातूर 60,00,000
26 अमरावती 30,00,000
27 अकोला 12,74,400
28 वाशिम 10,00,000
29 बुलढाणा 20,00,000
30 यवतमाळ 35,00,000
31 नागपूर 1,20,00,000
32 वर्धा 30,00,000
33 गोंदिया 25,00,000
34 भंडारा 24,00,000
35 चंद्रपूर 30,00,000
36 गडचिरोली 15,00,000
एकूण रूपये 54,75,47,070
राज्यातील रिक्त सरपंच, उपसरपंच पदांची निवड होणार
कोल्हापूर : राज्यात काही ग्रामपंचायतींच्या रिक्त असलेल्या सरपंच व उपसरपंच पदांच्या निवडी होण्यासाठी आवश्यक असलेली ग्रामपंचायतीची बैठक घेण्यास संमती देण्यात आली आहे. या बैठका कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक सर्व सूचनांचे तंतोतंत पालन करुन घेण्यात याव्यात, अशा सूचना देण्यात आल्याची माहिती राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकीशी संबंधीत कामकाज आहे त्या टप्प्यावर स्थगित करण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने मार्च रोजी आदेश दिले होते. तथापि, राज्यातील काही ग्रामपंचायतींमध्ये आधीच्या सरपंच, उपसरपंचांचे राजीनामे झाले आहेत. या ग्रामपंचायतींमध्ये आता नवीन सरपंच, उपसरपंचांची निवड करावयाची आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.