परराज्यातील मजुरांच्या प्रवासी शुल्कासाठी 54 कोटी

चिव आपत्ती व्यवस्थापन व मदत व पुनर्वसन विभाग यांनी दिलेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या यादीप्रमाणे मुख्यमंत्री सहाय्यता निधीतील रकमांचे अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे.
maharashtra  news
maharashtra news

मुंबई :  लॉकडाऊन कालावधीत परराज्यातील स्थलांतरीत मजुरांना त्यांच्या राज्यात पाठवण्यासाठी तसेच इतर राज्यात महाराष्ट्रातील स्थलांतरीत कामगार, मजुर अडकले आहेत. त्यांना पुन्हा महाराष्ट्रात आणण्यासाठी अशा मजुरांच्या श्रमिक रेल्वे तिकिटाचे शुल्क मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून भरण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली होती. त्यानुसार या 36 जिल्ह्यांना 54 कोटी 75 लाख 47 हजार 70 रुपयांचा निधी देण्यात आला असून तो संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आला आहे.

कोविड 19 च्या साथीमुळे लॉकडाऊन जाहीर झाले आणि महाराष्ट्रात इतर राज्यातील कामगार आणि मजुर अडकले. तसेच महाराष्ट्रातील कामगार आणि स्थलांतरीत मजुरही इतर राज्यांमध्ये अडकले आहेत. त्यांना या निर्णयाने मोठा दिलासा मिळेल. सचिव आपत्ती व्यवस्थापन व मदत व पुनर्वसन विभाग यांनी  दिलेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या  यादीप्रमाणे मुख्यमंत्री सहाय्यता निधीतील रकमांचे अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे. या निधीचा वापर केवळ ज्या कारणासाठी वितरित करण्यात आला आहे त्यासाठीच करता येणार आहे हे ही स्पष्ट करण्यात आले आहे.

जिल्ह्यांना देण्यात आलेला निधी असा: 

1 मुंबई शहर        12,96,00,000

2 मुंबई उपनगर   10,00,00,000

3 ठाणे                4,80,00,000

4 रायगड            2,50,00,000

5 रत्नागिरी           1,50,00,000

6 पालघर            3,00,00,000

7 सिंधुदूर्ग           1,00,00,000

8 नाशिक            40,00,000

9 धुळे                 25,00,000

10 नंदुरबार         25,00,000

11 जळगांव         20,00,000

12 अहमदनगर    20,00,000

13 पुणे               8,00,00,000

14 सातारा          95,81,270

15 सांगली          30,00,000

16 सोलापूर         50,00,000

17 कोल्हापूर       1,25,91,400

18 औरंगाबाद      80,00,000

19 जालना          50,00,000

20 बीड               30,00,000

21 परभणी         50,00,000

22 हिंगोली         6,00,000

23 नांदेड            20,00,000

24 उस्मानाबाद   20,00,000

25 लातूर            60,00,000

26 अमरावती      30,00,000

27 अकोला         12,74,400

28 वाशिम          10,00,000

29 बुलढाणा        20,00,000

30 यवतमाळ      35,00,000

31 नागपूर          1,20,00,000

32 वर्धा              30,00,000

33 गोंदिया          25,00,000

34 भंडारा            24,00,000

35 चंद्रपूर            30,00,000

36 गडचिरोली      15,00,000

एकूण रूपये           54,75,47,070

राज्यातील रिक्त सरपंच, उपसरपंच पदांची निवड होणार 
कोल्हापूर : राज्यात काही ग्रामपंचायतींच्या रिक्त असलेल्या सरपंच व उपसरपंच पदांच्या निवडी होण्यासाठी आवश्‍यक असलेली ग्रामपंचायतीची बैठक घेण्यास संमती देण्यात आली आहे. या बैठका कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्‍यक सर्व सूचनांचे तंतोतंत पालन करुन घेण्यात याव्यात, अशा सूचना देण्यात आल्याची माहिती राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकीशी संबंधीत कामकाज आहे त्या टप्प्यावर स्थगित करण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने मार्च रोजी आदेश दिले होते. तथापि, राज्यातील काही ग्रामपंचायतींमध्ये आधीच्या सरपंच, उपसरपंचांचे राजीनामे झाले आहेत. या ग्रामपंचायतींमध्ये आता नवीन सरपंच, उपसरपंचांची निवड करावयाची आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com