पुणे : भारतीय जनता पार्टीचे नेते रोजच सरकारवर टीका करीत आहेत.राज्य सरकार सक्षम आहे. सरकारला कोणताही धोका नाही. त्यामुळे त्यांच्यातील अस्वस्थता आणखी वाढत आहे. राम कदम यांच्यासारखे लोकही टीका करीत आहेत. हिंमत असेल तर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोथरूडमधून पुन्हा निवडून येऊन दाखवावे, असे आव्हान शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज दिले.
पुण्यात माध्यमांशी बोलताना त्यांनी भाजपा नेत्यांवर जोरदार टीका करीत भाजपा प्रदेशाध्यक्ष पाटील यांना आव्हान दिले. त्या म्हणाल्या, "राज्य सरकार योग्य दिशेने काम करीत आहेत. मात्र, भारतीय जनता पार्टीचे नेते कोणत्या ना कोणत्या कारणाने राज्य सरकारवर टीका करीत आहेत. या नेत्यांना आता कोणतेही काम उरलेले नाही. राज्य सरकार चांगले काम करीत आहे. मात्र, स्वत: सत्तेत नसल्याने भाजपाच्या नेत्यांची चिडचिड होत आहे. या भावनेतूनत ते राज्य सरकारवर चुकीच्या पद्धतीने टीका करीत आहेत. बीडमध्ये एका तरूणीवर ऍसिड व पेट्रोल टाकून तिला जाळण्याचा प्रकार अत्यंत निंदनीय असून त्या नराधम आरोपीला पकडल्याशिवाय पोलीस स्वस्थ बसणार नाहीत.''
किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या नावावर असलेल्या अलिबाग येथील जमिनीचे प्रकरण उघडकीस आणले. अन्वय नाईक यांच्याकडून ही जमीन खरेदी केल्याचे हे प्रकरण आहे. या प्रकरणामुळे शिवसेनेचे सर्वच नेते किरीट सोमय्या यांच्यावर चिडून आहेत. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी सोमय्या यांना 'वॉर्निंग'च्या भाषेत गप्प राहण्याचा सल्ला शनिवारी दिला होता. या पार्श्वभूमीवर डॉ. गोऱ्हे यांनी आज थेट चंद्रकांत पाटील यांनाच आव्हान दिले आहे. गेल्या काही दिवसात शिवसेना व भाजपातील आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण जोरात आहे. हे राजकारण कमी होण्याऐवजी वाढण्याचीच शक्यता दिसत आहे.
Edited By - Amit Golwalkar
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.