अमरावती : राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी पोलिस मारहाण प्रकरणी तात्काळ राजीनामा द्यावा, अन्यथा त्यांनी राजीनामा दिल्याशिवाय भाजप स्वस्थ बसणार नाही, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज अमरावती मधील तिवसा येथे दिला.
मंत्री यशोमती ठाकूर यांच्या राजीनाम्याची मागणी मागील काही दिवसांपासून भाजपच्या वतीने करण्यात येत आहे. आज अमरावती जिल्ह्यात चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात तिवसा येथे आंदोलन करण्यात आले. महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी 2012 मध्ये एका पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. त्यानंतर आता यशोमती ठाकूर यांना अमरावतीच्या न्यायालयाने तीन महिन्याची शिक्षा सुनावली आहे.
दरम्यान यशोमती ठाकूर यांनी या प्रकरणी राजीनामा द्यावा यासाठी भाजप कडून आंदोलन केले जात आहे. चंद्रकांत पाटील यांनी देखील आज आंदोलनाला भेट देऊन यशोमती ठाकूर यांनी यांनी राजीनामा द्यावा त्यांना न्यायालयाने शिक्षा सुनावली असताना त्यांना मंत्री पदावर राहण्याचा अधिकार नसून नैतिकतेच्या आधारावर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे असे चंद्रकांत पाटील म्हणाले .जोपर्यंत मंत्री राजीनामा देणार नाही तोपर्यंत भाजप स्वस्थ बसणार नाही असा इशाराही चंद्रकांत पाटील यांनी दिला.दरम्यान यशोमती ठाकूर यांचा राजीनामा तर काढून घेतला तर काँग्रेस सत्तेतून बाहेर पडेल अशी भीती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना असल्यामुळे यशोमती ठाकुरांचा राजीनामा घेत नसल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले.
Edited By - Amit Golwalkar
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.