पुणे : ''उत्तर प्रदेशात दोन दिवसांत बलात्काराच्या तीन घटना समोर आल्या. यावर त्या राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री काही बोलत नाहीत. पंतप्रधानांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी. जर योगी सरकारला महिलांची सुरक्षा सांभाळणे जमत नसेल, त्यांनी राजीनामा द्यावा,'' असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे.
हाथरसमधील युवतीवर पाच नराधमांनी बलात्कार करून तिचा मारहाण केली होती. पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. त्या युवतीचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला होता. मृत्यूनंतर तिचा मृतदेह गावात आणला पण, पोलिसांनी तिच्या आईवडीलांना आणि नातेवाईकांना विश्वासात न घेता परस्पर अंत्यसंस्कार केले. या पिडितेच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी व प्रियंका गांधी कार्यकर्त्यांसह हथरसकडे निघाले असता पोलिसांनी त्यांना अडवून धक्काबुक्की केली व नंतर अटक केली. त्यावरून राजकीय वातावरण तापले आहे.
वृत्तसंस्थेशी बोलताना सौ. सुळे यांनी उत्तर प्रदेशात सुरु असलेल्या घडामोडींवर भाष्य केले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबाबत काल घडलेल्या प्रकाराबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली. "राहुल व प्रियंका गांधी यांच्याबाबत काल जे काही घडले व त्यावर जिल्हाधिकारी व अन्य अधिकाऱ्यांनी जी काही वक्तव्ये केली, ती पाहता उत्तर प्रदेश सरकारना काहीतरी दडवायचे आहे असे दिसते,'' असे त्या म्हणाल्या.
काँग्रेस नेते सचिन पायलट यांनीही उत्तर प्रदेशातील घटनांवर टीका केली आहे. "पोलिस, प्रशासन व सरकारने एखाद्या गुन्ह्याचे पुरावे नष्ट केल्याचे उदाहरण मी पहिल्यांदा मानले. तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी बलात्कार पिडितेच्या नातेवाईकांना धमक्या दिल्या. विरोधी पक्षांचा आवाज दाबण्याचा मुख्यमंत्री व संपूर्ण प्रशासनाने पूर्ण प्रयत्न केला,'' असे पायलट म्हणाले.
Edited By - Amit Golwalkar
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.