रखडलेला विवाह या राज्यमंत्र्यांमुळे पार पडला 

विश्वजित कदम यांनी पुढाकार घेतला अन् मोजक्या लोकांच्या उपस्थितीत या विवाहाचे यजमानपद स्वीकारले.
kadam
kadam

पुणे : सांगली जिल्ह्यातील चिंचणी गावातील काँग्रेसचे कार्यकर्ते अजय पाटील यांचा विवाह गुरूवारी पार पडला. हा विवाह राज्याचे कृषी सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी अजय पाटील यांच्या शेतात लावून दिला. खुद्द मंत्रीमहोदय विश्वजित कदम यांनी पुढाकार घेतला अन् मोजक्या लोकांच्या उपस्थितीत या विवाहाचे यजमानपद स्वीकारले.

चिंचणी येथील काँग्रेसचे कार्यकर्ते अजय पाटील यांचा विवाह खानापूर तालुक्यातील कमळापूरचे माजी सरपंच अरविंद गायकवाड यांची पुतणी भाग्यश्री हिच्याशी ठरला होता. हा विवाह गेल्या दोन महिन्यापासून कोरोना संचारबंदीमुळे रखडला होता.

कोरोना संकटामुळे सर्वत्र लॅाकडाउन असल्याने हा विवाह कसा करायचा असा प्रश्न दोन्ही कुटुंबियासमोर होता. या रखडलेल्या विवाहाबाबत डॉ. विश्वजित कदम यांना समजल्यावर त्यांनी स्वतः पुढाकार घेत दोन्ही कुटुंबातील लोकांना या विवाह साध्या पध्दतीने आणि मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पाडण्याबाबत सुचवले होते. 

गरजूंना जीवनाश्यक वस्तू वाटप

दोन्ही परिवार डॉ. विश्वजित कदम यांच्या जवळचे असल्याने त्यांनी लगेच होकार दिला. वधू वर यांच्याकडील प्रत्येकी पाच पाच लोकांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा आनंदात साजरा करण्यात आला. हा विवाह वर अजय पाटील यांच्या शेतात पार पडला. सोशल डिस्टन्सिंग पाळत हा विवाह पार पडला. या विवाहास युवक नेते डॉ. जितेश कदम, माजी सरपंच अरविंद गायकवाड, संजय पाटील उपस्थित होते. लग्नासाठी येणारा खर्च टाळून त्या रकमेचे जीवनावश्यक साहित्य गावातील गरीब, कामगार, मजूर यांना वाटण्यात आले. या उपक्रमाचे सांगली जिल्हा परिसरात कैातुक होत आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com