प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला नक्षल्यांचे अग्नितांडव 

जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पुन्हा एकादा डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला एटापल्ली तालुक्यात नक्षलवाद्यांनी वाहनांची जाळपोळ केली आहे.
Naxal fire on the eve of Republic Day .jpg
Naxal fire on the eve of Republic Day .jpg

गडचिरोली : जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पुन्हा एकादा डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला एटापल्ली तालुक्यात नक्षलवाद्यांनी वाहनांची जाळपोळ केली आहे. 

सध्या कसनसूर- अल्लेंगा मार्गाचे काम सुरू आहे. नक्षल्यानी या कामाच्या ठिकाणी येऊन काम बंद पाडले आणि तिथे काम करत असलेल्या मजुरांना परत जाण्यास सांगितले. रस्त्याच्या कामावर असलेल्या जेसीबी, रोडरोलरची जाळपोळ केली.

संपूर्ण निवडणुकीत कुठल्याही कारवाया न करणारे नक्षली अचानक एक्शन मोडमध्ये आले आहेत. यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दहशतीच वातावरण पसरल आहे. 

नक्षलवाद्यांनी अचाणक केलेल्या या जाळपोळीत रस्त्याच्या कामासाठी वापरण्यात येत असलेल्या जेसीबी, रोडरोलर व इतर वाहनांची मोठी हानी झाली आहे.

यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थीक नुकसान झाले आहेच, मात्र, रस्त्याच्या कामावर याचा परिनाम होणार आहे. या आधीही रस्त्याची कामे बंद पाडण्यासाठी नलक्षवाद्यांनी अनेक वेळा रस्त्याच्या कामवर असलेल्या वाहनांची जाळपोळ केली आहे. 

हे ही वाचा... 

मंत्रिपद हुकल्याने नाराज तानाजी सावंतांची शिवसेनेच्या विरोधात भूमिका 

उस्मानाबाद : मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असलेले शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा आमदार प्रा. तानाजी सावंत यांनी उस्मानाबाद जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत स्वतःच्या पक्षाचे खासदार, आमदार व नगराध्यक्ष यांच्याविरोधात भूमिका घेतल्याचे दिसून आले. प्रा. सावंत महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून पहिल्यांदाच जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस उपस्थित राहिले होते. पण त्यांच्या भूमिकेवरून ते विरोधी पक्षाच्याच मानसिकतेत असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. 

पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (ता. 25 जानेवारी) जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये प्रा. सावंत यांनी शिवसेनेला घरचा आहेर दिला. 

कृष्णा-मराठवाडा प्रकल्पाच्या प्राधान्यक्रमात कळंब तालुक्‍यातील दुधाळवाडी व तुळजापूर तालुक्‍यातील रामदरा साठवण तलावापर्यंतच्या कामाचा समावेश करण्यात आला आहे. सरकारचा अभिनंदनाचा ठराव मांडण्याचा मुद्दा नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी मांडला. त्याला विरोध करीत खासदार व आमदार यांच्यामुळे हे काम झालेले नसल्याचा दावा या वेळी प्रा. सावंत यांनी केला. शिवाय जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचाही या कामाशी सबंध नसल्याचे सावंत यांनी सांगितल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांना चांगलाच धक्का बसला. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com