राज्यातील शेतकऱ्यांत प्रचंड असंतोष : सदाभाऊ खोत

गावोगावी कोविड 19 सेंटर उभा करून ग्रामपंचायतींना निधी उपलब्ध करून द्या.
mlc sadabhau khot raises issue of farmers in islampur
mlc sadabhau khot raises issue of farmers in islampur

पुणे: रयत क्रांती संघटनेचे संस्थापक आमदार सदाभाऊ खोत यांनी आज इस्लामपूर (जि. सांगली) येथे 'राज्यव्यापी शेतकरी बचाव आंदोलन' केले. रयत क्रांती संघटनेच्यावतीने हे आंदोलन राज्यभर करण्यात आल्याची माहिती सदाभाऊ खोत यांनी दिली.

यावेळी खोत यांनी तहसीलदार रवींद्र सबनीस यांना निवेदन दिले. "महाराष्ट्रातील शेतकरी अनेक संकटाचा सामना करत आहे. या पार्श्वभूमीवर रयत क्रांती संघटनेने आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलने केली व पत्रव्यवहार करून शेतकऱ्यांच्या समस्या सरकारच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत.  शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती व्यापक अशी बैठक राज्याचे मुख्यमंत्री किंवा कृषिमंत्री यांनी घेणे अगत्याचे होते. आपत्तीच्या कालखंडापासून शेतकऱ्यांच्या समस्याकडे लक्ष द्यायला सरकारकडे वेळ नसणे ही अत्यंत खेदजनक बाब आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्यात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून खालील प्रश्नावरती सरकारला वेळोवेळी जाणीव करून देण्याचे काम केलेले आहे. पण सरकार लक्ष देत नसल्याने अशा आपत्तीच्या काळात नाईलाजाने रयत क्रांती संघटनेला आंदोलनाचे हत्यार उपसावे लागले आहे" असे सदाभाऊ खोत म्हणाले.

यावेळी दिलेल्या निवेदनात, संपूर्ण कर्जमुक्ती मिळावी व शेतीपंपाचे वीज बिल माफ करावे. गाईच्या दुधाला प्रति लिटर 30 रुपये बाजार भाव मिळावा. बोगस सोयाबीन बियाणांमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंचनामे करून भरपाई मिळावी. बेदाण्याला प्रति किलो 200 रुपये बाजार भाव मिळावा. कांद्याला प्रतिक्विंटल 500 रुपये अनुदान द्या. खाजगी सावकार, बँका, फायनान्स यांच्या सक्तीची वसुलीवरती बंदी घालावी. शेतकऱ्यांना विनाअट तात्काळ पीक कर्ज देण्यात यावे. आधारभूत किमतीने कडधान्य, मका व कापूस खरेदी करा अन्यथा भावांतर योजना राबवा. गावोगावी कोविड 19 सेंटर उभा करून  ग्रामपंचायतींना निधी उपलब्ध करून द्या. कोविड-19 ने डबघाईला आलेल्या उद्योगांना चालना देऊन रोजगार उपलब्ध करा, या मागण्या करण्यात आल्या.

यावेळी वाळवा पंचायत समितीचे सदस्य राहुल महाडिक, कपिल ओसवाल, डी.के.पाटील, विनायक निकम, मोहसीन पटवेकर, सर्फराज डाके, बजरंग भोसले, लालसो धुमाळ, किरण उथळे, राजेंद्र पाटील, भानुदास मोटे, जयवंत पाटील, सुनील सावंत, दिनकर पाटील,संदीप फार्णे, स्वप्नील लोहार, हमीद मुलाणी, प्रमोद सुतार, सचिन पाटील, अतुल पाटील, धनाजी हुबाले, संदीप पाटोळे, अभिजित पाटील, दीपक आपटे उपस्थित होते. 

शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती व्यापक अशी बैठक राज्याचे मुख्यमंत्री किंवा कृषिमंत्री यांनी घेणे अगत्याचे होते. आपत्तीच्या कालखंडापासून शेतकऱ्यांच्या समस्याकडे लक्ष द्यायला सरकारकडे वेळ नसणे ही अत्यंत खेदजनक बाब आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com