वेळ पडल्यास विधानसभेत ओबीसी जनगणनेच्या प्रस्तावाची मागणी करु... 

आम्ही कोणाच्या हक्काचे मागत नाही. आमच्या हक्काचे आम्हाला द्या, आमच्या हक्काचे कोणी काढून घेत असेल तर आम्ही शांत बसणार नाही, अशा इशारा वडेट्टीवार यांनी दिला.
obc rally .jpg
obc rally .jpg

जालना : ओबीसींच्या जनगणनेचा मार्ग मोकळा करा आणि आम्हाला न्याय द्या, असे आवाहन राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारला केले. त्याच बरोबर मुख्यमंत्र्यांकडेही त्यांनी ओबीसींच्या जनगणनेची मागणी केली. वेळ पडल्यास विधानसभेत जनगणनेचा प्रस्ताव आणण्याची मागणी करू, असेही वडेट्टीवार म्हणाले. 

ओबीसी मोर्चाच्या मागण्यांचे निवेदन सरकारच्या वतीने मंत्री विजय वडेट्टीवार यांनी स्वीकारले, त्यावेळी ते बोलत होते.  
या मोर्चात महादेव जानकर, आमदार नारायण कुचे, विकास महात्मे, चंद्रशेखर बावनकुळे, खासदार भागवत कराड, आमदार राजेश राठोड आदी नेत्यांनी मोर्चात सहभाग घेतला. 

मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही. पण, मराठा समाजाला आरक्षण देताना आमच्या आरक्षणाला धक्क लावू नका. आम्ही कोणाच्या हक्काचे मागत नाही. आमच्या हक्काचे आम्हाला द्या, आमच्या हक्काचे कोणी काढून घेत असेल तर आम्ही शांत बसणार नाही, अशा इशारा वडेट्टीवार यांनी दिला. 

या मेळाव्याला सर्व पक्षांचे नेते उपस्थित आहेत. त्यामुळे ओबीसींच्या लढाईला पक्षीय स्वरुप देऊ नका. आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत हा संघर्ष थांबणार नाही. गोपीनाथ मुंडे यांनी ओबीसींच्यासाठी मोठे काम केले त्यांच्या कर्तृत्वाला सलाम आहे. छगन भुजबळ यांनी ओबीसींच्यासाठी काम केले आहे, असे वडेट्टीवार म्हणाले. 
 
ओबीसांच्या मुलांना पायलट होता आले पाहिजे. महाज्योतीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करू. ओबीसी मुलांसाठी प्रत्येक जिल्ह्यात दोन वस्तीगृह होणार आहे. जेईई- नीट परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांना महाज्योतीच्या माध्यमातून शिक्षण देणार असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. 

या मागण्यासाठी मोर्चा 

जालना येथे ओबीसी समाजाच्या वतीने आज भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आले होते. जनगणनेत ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करून, लोकसंख्येच्या प्रमाणात केंद्र शासनाने आरक्षणाची अंमलबजावणी करावी. ओबीसी प्रवर्गाच्या आरक्षणाला धक्का लागू नये, नॉन क्रिमीलियरची अट रद्द करावी यासह इतरही अनेक मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला.

पारंपारी वेशभूषाने वेधले लक्ष

या ओबीसी मोर्चात झालेल्या ओबीसी, व्हीजेएनटी, एनटी, एसबीसी समाज बांधवांनी पारंपारिक वेशभुषेत सहभागी झाले होते. त्यामुळे जालनेकरांचे लक्ष या मोर्चाने वेधले. दरम्यान विविध घोषांनानी जालना शहर दुमदुमन निघाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com