उपनगराध्यक्षांना अवघ्या तीन महिन्यांत द्यावा लागला राजीनामा

नगरपालिकेची पुढील वर्षी निवडणूक होणार असल्याने नगराध्यक्षपदासह उपनगराध्यक्षपदाला विशेष महत्व आहे.
Rajapur Deputy Mayor Sultan Thakur resigns in three months
Rajapur Deputy Mayor Sultan Thakur resigns in three months

राजापूर (जि. रत्नागिरी) : कॉंग्रेस पक्षासह मित्रपक्षांच्या साथीने गठित करण्यात आलेल्या आघाडीअंतर्गत झालेल्या निर्णयानुसार तीन महिन्यांच्या कालावधीनंतर राजापूर नगरपालिकेतील सत्ताधारी कॉंग्रेस आघाडीचे उपनगराध्यक्ष सुलतान ठाकूर यांनी उपनगराध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे रिक्त झालेल्या उपनगराध्यक्ष पदासाठी येत्या सोमवारी (ता. 19 एप्रिल) निवडणूक होणार आहे. त्यामध्ये सत्ताधाऱ्यांकडून नेमकी कोणाला संधी दिली जाणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

आघाडीमध्ये उपनगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळविण्यामध्ये इच्छुकांमध्ये चुरस आहे. त्यासाठी सद्यःस्थितीमध्ये सुभाष बाकाळकर, आसिफ मुजावर आणि भाजपचे गोविंद चव्हाण यांची नावे चर्चेत आहेत. नगरपालिकेची पुढील वर्षी निवडणूक होणार असल्याने नगराध्यक्षपदासह उपनगराध्यक्षपदाला विशेष महत्व आहे.

उपनगराध्यक्ष पदासाठी सत्ताधारी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीकडून कॉंग्रेसचे सुभाष बाकाळकर, आसिफ मुजावर, भाजपचे गोविंद चव्हाण आदींची नावे चर्चेत आहेत. त्यामध्ये उपनगराध्यक्ष पदासाठी सत्ताधारी गटाकडून नेमकी कोणाची वर्णी लागणार? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

सत्ताधारी आघाडीमध्ये अंतर्गत झालेल्या निर्णयानुसार आघाडीतील नगरसेवकांना उपनगराध्यक्षपदासाठी सर्वांना संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार ठाकूर यांनी आघाडीतील अन्य नगरसेवकांना संधी मिळावी; म्हणून आपला तीन महिन्यांचा कालावधी संपुष्टात येताच उपनगराध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे रिक्त झालेल्या उपनगराध्यक्षपदासाठी येत्या सोमवारी (ता. 19 एप्रिल) निवडणूक होणार आहे. 

येत्या वर्षअखेरीला नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. त्यापूर्वी रिक्त झालेल्या उपनगराध्यक्ष पदासाठी लवकरच निवडणूक जाहीर होणार आहे. नव्या उपनगराध्यक्षांना उर्वरित सुमारे आठ महिन्यांची संधी मिळणार आहे. त्यामुळे रिक्त झालेल्या या उपनगराध्यक्ष पदासाठी सत्ताधारी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीकडून नेमकी कोणाला संधी मिळणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा : वा रे ठाकरे सरकार....केंद्राने दिलेली डाळही गरिबांपर्यंत पोचू दिली नाही 
 
जळगाव  ः राज्यातील गोडाऊनमध्ये तूरडाळ सडल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाचे जळगाव जिल्हाध्यक्ष तथा आमदार सुरेश भोळे यांनी राज्यातील ठाकरे सरकारवर टीकेची तोफ डागत सराकरचा निषेध केला आहे.

भाजप आमदार सुरेश भोळे यानी गेल्या कांही दिवसांपासून ठाकरे सरकारवर सोशल मीडियाच्या माध्यमातून टीकेचा भडिमार सुरू केला आहे. सरकारने जाहीर केलेल्या लॉकडाऊनच्या विरोधात भूमिका घेत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  आणि महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवली होती. 

लॉकडाऊनची घोषणा करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेले पॅकेज फसवे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यानंतर आज त्यांनी पुन्हा एकदा ट्विट करून ठाकरे सरकारवर टीका केली आहे. आपल्या ट्विटमध्ये आमदार सुरेश भोळे म्हणतात की, वा रे ठाकरे सरकार, केंद्र सरकारने पाठवलेली लाखो टन डाळीची मदत ठाकरे सरकारने गोरगरीब जनतेपर्यंत पोचू दिली नाही. अनेक महिने ती गोडाऊनमध्ये ठेऊन कुजविली आणि एकीकडे शिवभोजन राबवित आहेत. गरिबांच्या पोटावरसुध्दा राजकारण करणाऱ्या ठाकरे सरकारचा धिक्कार असो.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com