शक्तीप्रदर्शन संजय राठोडांचे गुन्हा मात्र, दहा हजार लोकांवर 

टिकटॉक स्टार पूजा चव्हाणच्या मृत्यूनंतर अज्ञातवासात असलेले वनमंत्री संजय राठोड हे वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे मंगळवार (ता. २३ फेब्रुवारी) आले होते.
 Sanjay Rathore .jpg
Sanjay Rathore .jpg

वाशिम : टिकटॉक स्टार पूजा चव्हाणच्या मृत्यूनंतर अज्ञातवासात असलेले वनमंत्री संजय राठोड हे वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे मंगळवार (ता. २३ फेब्रुवारी) आले होते. त्यांचे समर्थक येणार असल्याने गर्दी होऊ नये म्हणून मानोरा पोलिसांनी येथील महंतांना नोटीस दिल्या होत्या.

तरीही बंजारा समाज बांधव मोठ्या प्रमाणात पोहरादेवी येथे आल्याने कायद्याचा भंग झाल्यामुळे मानोरा पोलिस स्टेशन मध्ये मुख्य दहा जनांसह दहा हजार अज्ञात नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र, ज्या महंतांना नोटीस देण्यात आल्या होत्या त्यांना वगळण्यात आल्याने पोलिसांनी दबावात कारवाई केली का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

पोहरादेवी येथील गर्दी केल्या प्रकरणी आयोजक असलेले महंत यांच्यावर गुन्हे दाखल न करता इतर नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. या संदर्भात पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांना विचारले असता त्यांनी पोहरादेवी येथील महंतांनी आम्हाला मदत केली असल्याचे सांगितले तर वनमंत्री संजय राठोड यांच्यामुळे गर्दी झाली त्यामुळे संजय राठोड यांच्यावर गुन्हे दाखल होणार का? असे विचारले असता त्यांनी बोलण्याचे टाळले. 

दरम्यान, राठोड पोहरादेवी येथे कुटूंबासह दाखल झाले होते. त्याठिकाणी राठोड यांनी कुटूंबासह जगदंबा मातेचे दर्शन घेतले. त्यावेळी संजय राठोड यांच्या समर्थकांनी प्रचंड गर्दी केली होती. त्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेत, संबंधितांवर जिल्हा व पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी, असे आदेश दिले आहेत. तसेच वाशीम जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना याचा अहवाल देण्यास सांगण्याच्या सूचना मुख्य सचिवांना दिल्या आहेत. 

दरम्यान, गोरबंजारा समाजातील मुलगी पूजा चव्हाण हीचा पुणे शहरातील वानवाडी परिसरात मृत्यू झाला. तिच्या मृत्यूचे दुःख मला, माझ्या कुटुंबीयांना आणि संपूर्ण बंजारा समाजाला आहे. पण या घटनेनंतर माझ्यावर विरोधकांकडून बिनबुडाचे आरोप करण्यात आले. अतिशय घाणेरडे राजकारण केले जात आहे. ते अतिशय चुकीचे आणि निराधार आहे. माझ्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप खोटे आहेत. या एका घटनेमुळे मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करू नका, असे संजय राठोड यांनी पोहरादेवी येथे पत्रकार परिषदेत सांगितले होते. 

राठोड म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. चौकशीनंतर प्रकरणातील सत्य काय ते समोर येणारच आहे. विविध माध्यमांतून माझी, माझ्या परिवाराची आणि समाजाजी बदनामी केली जात आहे. राज्यात त्याबद्दल घाणेरडे राजकारण केले जात आहे, हे दुर्देवी आहे. मी भटक्या जमातीतील व्यक्ती समाजकारणातून राजकारणात आलो. गेले ३० वर्ष मी समाजासाठी जनतेसाठी काम करतो आहे. ओबीसी समाजाचे नेतृत्व करत आहे. पण या एका घटनेवरून विविध आरोप करून मला राजकीय आयुष्यातून उद्धवस्त करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे राठोड यांनी सांगितले.  

Edited By - Amol Jaybhaye 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com