दत्तात्रेय भरणे यांना पालकमंत्रिपदावरून हटवा : शिवसेनेची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

पालकमंत्री मात्रआपल्या कर्तव्याला विसरत आहेत.
Shiv Sena demands removal of Dattatreya Bharne from the post of Guardian Minister of Solapur
Shiv Sena demands removal of Dattatreya Bharne from the post of Guardian Minister of Solapur

करमाळा : सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे हे स्वतःचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्ह्यात वाढवण्याच्या कामासाठी फिरत आहेत. मात्र, सोलापूर जिल्ह्यातील कोरोना रोखण्यासाठीच्या उपाय योजना करण्यासाठी त्यांना वेळ नाही, असा आरोप करत दत्तात्रेय भरणे यांच्याकडील पालकमंत्रिपदाची जबाबदारी काढून घ्यावी, अशी मागणी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. 

याबाबत अधिक माहीती देताना महेश चिवटे यांनी सांगितले की, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांचे जिल्ह्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. कोरोनाच्या काळात ते निष्क्रिय असल्याचे दिसून येत आहे. सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचे संकट वाढत असताना त्यांचे जिल्ह्यात कुठेही लक्ष नाही, त्यांचा शासकीय अधिकारी, पदाधिकारी व सर्वसामान्य जनतेशी कसलाही संपर्क नाही, अशा मंत्र्यांकडे सोलापूर जिल्ह्यातील पालकमंत्रीची जबाबदारी काढून घेऊन ती दुसऱ्या एका सक्षम मंत्र्यांकडे द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. 

महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनीच दत्तात्रेय भरणे यांचे पालकमंत्रीपद बदलण्याची भूमिका घेतल्याने या विषयाची चर्चा रंगली आहे. सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचे प्रचंड संकट आहे. अनेक रूग्णांना ऑक्सीजन वेळेत मिळत नाही. हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होण्यासाठी जागा मिळत नाही, यामुळे अनेकांचे दुर्दैवी मृत्यू होत आहेत. 

करमाळा तालुक्यात सध्या फक्त ३५ बेड उपलब्ध असून या ठिकाणी राज्य सरकारने कुठल्याही प्रकारचा ऑक्सिजन उपलब्ध करून दिलेला नाही. रेमडेसिव्हिर औषधाअभावी रुग्णांचे प्राण जात आहेत. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याशी वारंवार फोनवरून संपर्क करून औषधांची मागणी केली आहे. रेमडेसिव्हिर इंजेक्शन उपलब्ध करून देण्यासाठी नेमलेल्या कमिटीचे सदस्य फोनही उचलत नाही.

लॉकडाऊनची योग्य अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनावर पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचा कोणताही वचक राहिलेला नाही. एकीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जीवाची बाजी लावून महाराष्ट्र वाचवण्यासाठी प्रयत्न करत असताना दुसरीकडे सत्तेचे पांघरून घेतलेले पालकमंत्री मात्र आपल्या कर्तव्याला विसरत आहेत, असा आरोपही चिवटे यांनी पत्रात केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com