महापालिकेत सत्ताधारी भाजप व विरोधी शिवसेना एकच!

महापालिकेत मागच्या दाराने प्रस्ताव कधी येतात, चर्चा न होताच ते प्रस्ताव मागे घेतले जातात. सत्ताधारी व प्रमुख विरोधी पक्षाबद्दल चर्चाही घडू देत नाही. त्यामुळे पालिकेत सत्ताधारी कोण व विरोधक कोण, हेच समजून येत नाही.
Shahu Khaire
Shahu Khaire

नाशिक : महापालिकेत मागच्या दाराने प्रस्ताव कधी येतात, चर्चा न होताच ते प्रस्ताव मागे घेतले जातात. सत्ताधारी व प्रमुख विरोधी पक्षाबद्दल चर्चाही घडू देत नाही. त्यामुळे पालिकेत सत्ताधारी कोण व विरोधक कोण, हेच समजून येत नाही. सत्ताधारी भाजप व विरोधक शिवसेना दोघेही एकच असल्याचा आरोप काँग्रेसचे गटनेते शाहू खैरे यांनी केला.

महापालिकेत सत्ताधारी पक्ष भाजप, तर प्रमुख विरोधी पक्ष शिवसेना आहे. दोन्ही पक्ष एकमेकांचे विरोधक दिसत असले, तरी अनेक विषयांमध्ये या पक्षांची भूमिका एकसारखीच दिसत आहे. प्रशासनाने ठेवलेले प्रस्तावाचे कधी ठरावात रूपांतर होते व अनेकदा ठरावच मागे घेतले जातात. महापालिकेचे विश्‍वस्त असलेल्या सदस्यांना समजत नाही. घरपट्टी वसुलीचे खासगीकरण हा त्यापैकीच एक विषय. डिसेंबर महिन्यात झालेल्या महासभेत जादा विषयांमध्ये घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीचा प्रस्ताव घुसविण्यात आला. वास्तविक त्यावर चर्चा होणे अपेक्षित होते. गाजावाजा झाल्यानंतर सत्ताधारी भाजपला ही बाब अंगलट येण्याची भीती वाटल्याने तातडीने मागे घेतला. प्रस्ताव मागे घेतानाही महासभेत चर्चा करणे गरजेचे असते. मात्र, ते न करता परस्पर मागे घेतला गेला. विरोधकांनीही या विषयावर शब्दही काढला नाही. 

ते म्हणाले, महापालिकेत सत्ताधारी व विरोधकांची सरमिसळ झाली आहे. भूसंपादन असो की कब्रस्तानच्या जागेच्या प्रस्तावाचेही तसेच आहे. महासभेत या विषयांवर चर्चा होणे अपेक्षित आहे. आता घरपट्टी वसुलीचा ठराव रद्द करून मानधनावर कर्मचारी भरती करण्याचा ठराव केला आहे. यासंदर्भातही नगरसेवकांना माहिती नाही. त्यामुळे महापालिकेत चाललंय तरी काय, असा प्रश्‍न सर्वसामान्यांना पडला आहे. बीएस-६ प्रकारच्या बस शहरात चालविल्या पाहिजे, हे शिवसेनेला शहाणपण उशिराने का सुचले? आपसात जमले नाही का, असा सवाल उपस्थित करताना श्री. खैरे यांनी एकीकडे बससेवेचे समर्थन करायचे, दुसरीकडे विरोध करायचा, हा विरोधाभास चुकीचा असल्याचे सांगितले.
..
धोरणात्मक विषयांवर सदस्यांना विश्‍वासात घेऊनच निर्णय घ्यायचा असतो. मात्र, तसे न करता भाजपच्या सत्ता काळात वादग्रस्त ठराव मंजूर करायचा. वाद निर्माण झाल्यावर मागे घ्यायचा, अशी चुकीची प्रथा पडली आहे.
- शाहू खैरे, गटनेते, काँग्रेस

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com