ub29.jpg
ub29.jpg

राष्ट्रपती अभिभाषणावर सोळा पक्षांचा बहिष्कार..अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून.. 

राष्ट्रवादी, तृणमूल, आप, अकाली दल, द्रमुक, सीपीआय, माकप, सपा आणि राजद अशा पक्षांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकला आहे.

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहेत. विरोधी पक्ष केंद्र सरकारला अडचणीत आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. या अधिवेशनावर शेतकरी आंदोलनाचे सावट आहे. सत्ताधारी मोदी सरकारला पेचात अडकवत त्यांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्हं उपस्थित करत काँग्रेस, राष्ट्रवादी, तृणमूल, आप, अकाली दल, द्रमुक, सीपीआय, माकप, सपा आणि राजद अशा पक्षांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकला आहे. 

गेल्या पावसाळी अधिवेशनात कृषी कायद्यांच्या मुद्दय़ावर राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) बाहेर पडलेल्या अकाली दलाने तसेच आम आदमी पक्षानेही राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकण्याचे ठरवले आहे. कृषी कायद्यांना ‘आप’ने विरोध केल्याचे पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी सांगितले. विरोधी पक्षांच्या संयुक्त निवेदनात या दोन पक्षांचा समावेश नसला तरी शेती कायद्यांच्या प्रश्नावर अर्थसंकल्पीय अधिवेशनात सत्ताधारी पक्षाला घेरण्याची व्यूहरचना विरोधकांकडून आखली असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या अर्थंसंकल्पात मागच्या दोन वर्षांमधील देशाच्या आर्थिक वाटचालीचा अहवाल आणि सोबतच अडचणींवर मात करत आर्थिक क्षेत्रात देशाची वाटचाल नेमकी कोणत्या दिशेनं राहिली यासंदर्भातील अहवाल सादर करण्यात येणार आहे.

देशातील १६ विरोधी पक्षांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय गुरुवारी घेतला. दरम्यान, दिल्लीतील हिंसाचारास जबाबदार ठरवून सरकार आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न करत असले तरी कृषी कायदे रद्द केल्याशिवाय माघार घेणार नसल्याचे शेतकरी नेत्यांनी स्पष्ट केले आहे. 


हेही वाचा :  शशी थरुर, राजदीप सरदेसाईंविरोधात देशद्रोहाचा गुन्हा
 
नवी दिल्ली : काँग्रेसचे खासदार शशी थरुर, पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्यासह आणखी सहा पत्रकारांच्या विरोधात उत्तर प्रदेश सरकारने देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. एका सामाजिक कार्यकर्त्याने केलेल्या तक्रारीवरुन हा गुन्हा नोंदविण्यात आला असून प्रजासत्ताक दिनी झालेल्या ट्रॅक्टर रॅलीचे विपर्यास्त वार्तांकन करणे व समाजमाध्यमांवर चुकीची माहिती प्रसारित करुन भावना भडकवण्याचा आरोप या सर्वांवर ठेवण्यात आला आहे. धर्म, जात, पंथ यांच्या आधारे समाजात दुही माजवणे, राष्ट्रीय एकात्मतेला धक्का लावणारे कृत्य करणे, शांतता भंग करण्याच्या हेतूने काही कृत्य करणे, समाजात शत्रूत्व निर्माण करणे, यासाठी कट करणे असे विविध आरोप या सर्वांवर ठेवण्यात आले आहेत. प्रसासत्ताक दिनी झालेल्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान एका आंदोलकाचा मृत्यू झाला होता. त्याबाबत चुकीचे वार्तांकन व चुकीचा संदेश जाईल, असे ट्वीट केल्याची तक्रार अर्पित मिश्रा या समाजसेवकाने नाॅएडा पोलिसांकडे दिली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com