Matheran
Matheran

वाहन बंदी असलेल्या गावात आता टेम्पो धावणार... 

माथेरान शहरात टेम्पोला प्रवेश म्हणजे या संकटकाळात माथेरानकरांसाठी ऐतिहासिक निर्णयासोबत दिलासदायक बाब आहे. माथेरानमध्ये सध्या आनंदाचे वातावरण आहे.

मुंबई : माथेरान शहरात टेम्पोला प्रवेश म्हणजे या संकटकाळात माथेरानकरांसाठी ऐतिहासिक निर्णयासोबत दिलासदायक बाब आहे. माथेरानमध्ये सध्या आनंदाचे वातावरण आहे. पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील असलेल्या माथेरानमध्ये मोटारवाहनांना बंदी आहे.  येथे सर्वप्रकारची वाहतुक मनुष्यबळावर चालणाऱ्या हातगाडीतून अथवा घोड्यावरुन केली जाते.

कोव्हीड १९ महामारीच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य माथेरानकरांना जीवनावश्यक वस्तू स्वस्त व वाजवी दरात मिळाव्यात, यासाठी कर्जतचे माजी आमदार सुरेश लाड, माथेरानचे माजी नगराध्यक्ष अजय सावंत तसेच सामाजिक कार्यकर्ते सुनिल शिंदे यांनी जीवनावश्यक  मालवाहतूकीकरीता टेम्पोला परवानगी मिळावी, यासाठी उच्च न्यायालयात याचिकेद्वारे हा विषय लावून धरला होता.

यानुषंगाने उच्च न्यायालयाने दोन महिने अगोदर टेम्पोला परवानगी दिली असताना देखील जिल्हा प्रशासन व संनियत्रण समितीने न्यायालयाच्याच निर्णयाला बगल देत माथेरानमध्ये मालवाहतुकीसाठी विशेष बाब म्हणुन मालवाहु रेल्वे सेवा देऊ केली होती. मात्र, या रेल्वे सेवेला चक्रीवादळाचा तडाखा तसेच ही सेवा सुरु झाल्यापासून तोट्यामध्ये रिकाम्या फेऱ्या मारत असल्याने रेल्वे प्रशासनाने अखेर रेल्वे सेवा बंद केली. रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी उच्च न्यायालयाच्या आदेश प्राप्त होऊन आज एक महिन्याच्या प्रतिक्षेनंतर अखेर माथेरान शहरात टेम्पोच्या फेऱ्या पुन्हा एकदा हातचा ठेवत आठवड्यातुन तीन  फेऱ्याची उच्च न्यायालयाची परवानगी असताना त्या ऐवजी एकच फेरीला परवानगी दिली आहे.  

माथेरानकरांचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी खंत याचिकाकर्त्यांनी केली आहे. मात्र, माथेरान शहरात टेम्पोला प्रवेश म्हणजे या संकटकाळात माथेरानकरांसाठी ऐतिहासिक निर्णयासोबत दिलासदायक बाब आहे. माथेरानमध्ये सध्या आनंदाचे वातावरण असले तरी माथेरानकर जिल्हा प्रशासनाने  उच्च न्यायालयाच्या निर्णयाची अमलबजावणी करुन माथेरान नगरपरिषदेने देखील ही सेवा लवकर सुरु करावी, अशी मागणी केली आहे.

हेही वाचा : महावितरणमध्ये येत्या आठवड्यात प्रलंबित भरती
 
मुंबई : लॅाकडाउनच्या काळात अनेक जणांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, अशा परिस्थितीत मात्र महावितरणने एक गुड न्यूज दिली आहे. महावितरणमध्ये विद्युत सहाय्यक व उपकेंद्र सहाय्यक पदाच्या सात हजार जागांची भरती प्रक्रिया गेल्या आठ महिन्यांपासून प्रलंबित आहे. राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी पुढील आठवड्यात या सर्व पदांसाठी पात्र उमेदवारांची निवड यादी जाहीर करण्याचे आदेश महावितरणला दिले आहे. यामुळे प्रलंबित निवड प्रक्रियेतील उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. महावितरणमधील प्रलंबित भरती प्रक्रिया देखील पूर्ण होणार आहे. तसेच ग्राहकसेवेसाठी तब्बल 7 हजार कर्मचाऱ्यांची आणखी भर पडणार आहे. महावितरण कंपनीमध्ये जुलै 2019 मध्ये उपकेंद्र सहाय्यक पदाच्या 2 हजार आणि विद्युत सहाय्यक पदाच्या 5 हजार अशा एकूण 7 हजार पदांच्या सरळसेवा भरतीसाठी प्रक्रिया सुरु करण्यात आली. यामध्ये 25 अॉगस्ट 2019 रोजी उपकेंद्र सहाय्यक पदासाठी आयबीपीएस या संस्थेकडून परीक्षा घेण्यात आली आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com