हिमकडा कसा कोसळला? शास्त्रज्ञांकडून शोध सुरू...

हिमकडा कोसळण्याच्या घटनेचा अभ्यास डिफेन्स रिसर्च अॅन्ड डेवलपमेंट अॉर्गनायझेशन (डीआरडीओ) च्या शास्त्रज्ञांची टीम करणार आहे. ही टीम सकाळीच जोशी मठ परिसरात पोहचली आहे.
Team Of Scientists In Uttarakhand For Surveillance After Glacier Burst
Team Of Scientists In Uttarakhand For Surveillance After Glacier Burst

डेहराडून : हिमकडा कोसळण्याच्या घटनेचा अभ्यास डिफेन्स रिसर्च अॅन्ड डेवलपमेंट अॉर्गनायझेशन (डीआरडीओ) च्या शास्त्रज्ञांची टीम करणार आहे. ही टीम सकाळीच जोशीमठ परिसरात पोहचली आहे. हिमस्खलन आणि संबंधित घटनांचा अभ्यास करून रविवारी घडलेल्या घटनेचे कारण शोधले जाणार आहे. 

चमोली जिल्ह्यातील जोशी मठमधील रेनी गावाजवळ रविवारी हिमकडा कोसळला. त्यामुळे अलकनंदा व धौलीगंगा नदीच्या पाण्याची पातळी अचनाक मोठ्या प्रमाणावर वाढली. नदीव ऋषिगंगा उर्जा प्रकल्पाचे काम सुरू होते. नदीला आलेल्या पूरामुळे हा प्रकल्प उध्वस्त झाल्याची माहिती आहे. तपोवन धरणालगत सुरू असलेल्या कामावरील सुमारे 170 मजूर वाहून गेल्याची भिती व्यक्त करण्यात येत होती. त्यापैकी 15 जणांना वाचविण्यात आले आहे. 

हिमकडा कोसळून झालेल्या दुर्घटनेत तपोवन परिसरातील बोगद्यांमध्ये आतापर्यंत 14 जणांचे मृतदेह आढळून आले आहेत. बोगद्यांमध्ये अद्याप 150 जण बेपत्ता असून सर्वत्र गाळ पसरल्याने बवाचकार्यात अडथळे येत आहेत.
हिमकडा कोसळण्यामागे नेमके कारण शोधण्याची जबाबदारी शास्त्रज्ञांवर सोपविण्यात आली आहे. ही टीम घटनेच्या ठिकाणी जाऊन हिमकडा कोसळण्याच्या कारणांचा शोध घेणार आहे. अलकनंदा नदीवरच ऋषिगंगा ऊर्जा प्रकल्पाचे काम सुरू होते. हा प्रकल्प पुर्णपणे उध्वस्त झाला आहे. तिथून काही किलोमीटर अंतरावरील हिमकडा कोसळला आहे. 

शास्त्रज्ञ घेतील याचा शोध

हिमकडा कोसळण्यामागे विविध कारणे असतात. त्यामध्ये धूप, पाण्याचा दाब वाढत जाणे, हिमस्खलन, भूकंप, बर्फ वितळणे, ग्लोबल वॉर्मिंग, जमिनीखालील हालचाली आदींचा समावेश असतो. रविवारी घडलेल्या दुर्घटनेमागे यापैकी नेमके कोणते कारण होते, याचा शोध शास्त्रज्ञांकडून घेतला जाणार आहे. त्यासाठीची आवश्यक सर्व साधनसामुग्री घेऊन विशेष विमान रविवारी रात्रीच डेहराडूमध्ये दाखल झाले. 

हिमकडा का कोसळतो?

हिमकडा कोसळण्याची अनेक कारणे सांगता येतील. त्यामध्ये धूप, पाण्याचा दाब वाढत जाणे, हिमस्खलन, भूकंप याचा समावेश असतो. हिमकडा कोसळताना त्यातील पाणी सखल भागाकडे झेपावते. कोट्यवधी लिटर पाणी एकाचवेळी झेपावल्याने महापूराची स्थिती निर्माण होते. हिमकड्यांमध्ये पाण्याचे प्रमाण कमी अधिक प्रमाणात असते. त्यानुसार त्याची तीव्रता ठरते. काही वेळा पुर्ण हिमकडा कोसळत नाही. थोडा-थोडा भाग निसटत जातो. त्यानुसार पाणीहीही कमी-अधिक प्रमाणार बाहेर पडते. काही मिनिटे, काही तास, काही दिवस पाणी वाहत राहते.

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com