आमदारांवरील खटले मागे घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

खटले मागे न घेता त्यावर सुनावणी होणार असल्याचे सुप्रीम कोर्टानं आपल्या निकालामध्ये म्हटलं आहे.
0Supreme_20Court_15.jpg
0Supreme_20Court_15.jpg

नवी दिल्ली : केरळ सरकारला सुप्रीम कोर्टाने Supreme Court झटका दिला आहे. २०१५ मध्ये झालेल्या केरळ विधानसभा Kerala Assembly निवडणुकीत झालेल्या वादात माकप नेत्यांच्या विरोधात खटला दाखल करण्यात आला आहे.  हे खटले मागे न घेता त्यावर सुनावणी होणार असल्याचे सुप्रीम कोर्टानं आपल्या निकालामध्ये म्हटलं आहे. याबाबत उच्च न्यायालयाने दिलेला निकाल सुप्रीम कोर्टानं कायम ठेवला आहे.  

केरळ विधानसभा निवडणुकीत झालेल्या वादात माकप नेत्यांवर खटला दाखल करण्यात आले आहेत. हे खटले मागे घ्यावेत, अशी याचिका केरळ सरकारने दाखल केली होती. ही याचिका सुप्रीम कोर्टानं  फेटाळली आहे.  न्यायाधीश डी.वाय. चंद्रचुड यांनी हा निकाल दिला आहे.  ता. १५ जुलै रोजी याबाबत सुनावणी झाली होती. त्याचा निकाल राखून ठेवण्यात आला होता. 

न्यायाधीश चंद्रचुड यांनी केरळ सरकारकडे विचारणा केली आहे की, विधानसभेत जो राडा झाला. त्यामुळे जे नुकसान झाले त्याला आमदार जबाबदार नाही का. असा प्रकरणात माफी देणं चुकीचे ठरेल. सभागृहात आमदार ध्वनीक्षेपक फेकतात, तोडफोड करतात, हा त्यांचा व्यवहार योग्य आहे का. याचा सामान्य जनतेवर काय परिणाम होऊ शकतो याचा विचार जनतेचे प्रातिनिधीत्व करणाऱ्या आमदारांनी करावा.

आता SIT करणार परमबीर सिंग प्रकरणाचा तपास
मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या प्रकरणाचा तपास एसआयटी करणार आहे. त्यासाठी पोलिस उपायुक्तांच्या नेतृत्वाखाली एसआटीची स्थापना करण्यात आली आहे. मुंबईत दाखल दोन गुन्ह्यांमध्ये परमबीर सिंग यांच्या सहभागाबाबत ही एसआयटी तपास करणार आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com