मोदींनी मैान सोडले..म्हणाले "सरकार आणि शेतकरी यांच्यात फक्त एका कॉलचं अंतर..

शेतकरी आंदोलनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच मैान सोडले आहे.
modi.jpg
modi.jpg

नवी दिल्ली : कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी दोन महिन्यापासून शेतकरी केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करीत आहेत. उत्तरप्रदेश, पंजाब, हरियाणा येथील शेतकरी दिल्लीच्या सीमेवर सरकार विरोधात रस्त्यावर उतरले आहेत. प्रजासत्ताक दिनी लाल किल्ला परिसरात हिंसाचार झाला. याबाबत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नाराजी व्यक्त केली आहे. शेतकरी आंदोलनावरून संसदेच्या अधिवेशनात पडसाद उमटण्याची शक्यता आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक झाली. यात मोदींनी कृषी कायदे आणि शेतकरी आंदोलनाबद्दल केंद्र सरकारची भूमिका मांडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विषयावर पहिल्यांदाच मैान सोडले आहे. ते म्हणाले, "सरकार आणि शेतकरी यांच्यात फक्त एका काँलचं अंतर आहे.. विरोधकांसोबत वाटाघाटीतून हा प्रश्न सोडविता येऊ शकतो"   
 

मोदी म्हणाले, "कृषीमंत्री नरेंद्र सिंह तौमर यांनी सांगितलेलाच मुद्दा मी पुन्हा एकदा सांगतो. शेतकरी आणि सरकार यांच्यात अंतिम तोडगा भलेही निघाला नसेल, पण सरकार शेतकऱ्यांसमोर पर्याय ठेवत आहे. शेतकऱ्यांनी यावर चर्चा करावी. त्यांनी शेतकऱ्यांना सांगितलं आहे की, शेतकऱ्यांपासून ते फक्त एका कॉलच्या अंतरावर आहेत." 

"कृषीमंत्री नरेद्र सिंह तौमर यांच्याकडून शेतकऱ्यांना देण्यात आलेला प्रस्ताव अजूनही कायम आहे. शेतकऱ्यांसोबत चर्चा करण्यासाठी सरकार तयार आहे. आपल्या समर्थकांना याबद्दल सांगावं. चर्चेतूनच तोडगा निघायला हवा. आपण सगळ्यांनी देशाबद्दल विचार करावा लागेल," असे आवाहन मोदींनी आज विरोधकांना केले.

हेही वाचा : 'या' कारणासाठी राज्यपालांनी राज्य सरकारला खडसावले..
नागपूर : राज्यात इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले आहे. अशावेळी महाविद्यालये व विद्यापीठातील प्रत्यक्ष वर्ग सुरू न होणे विसंगत व विपरीत वाटत असल्याचे मत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी व्यक्त करीत, राज्याच्या कारभारावर टिका केली आहे. विद्यापीठ महाविद्यालयांत वर्ग सुरू करण्यास तयार आहे, पण राज्य सरकारने त्यासाठी परवानगी न दिल्याने राज्यपालांनी सरकारला खडसावले आहे. राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली. यावेळी सर्वच कुलगुरूंनी राज्यातील महाविद्यालये सुरू करण्याची मागणी केली असता, त्यास उत्तर देताना ते बोलत होते. बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव ओमप्रकाश गुप्ता तसेच राज्यातील सर्व २० विद्यापीठांचे कुलगुरू उपस्थित होते. राज्यातील सर्व उच्च शिक्षण संस्था व महाविद्यालयातील वर्ग त्वरित सुरू करण्याची विद्यापीठांची तयारी आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com