महाराष्ट्र सरकारच बेजबाबदार; लशीचा तुटवडा नाही! आरोग्यमंत्र्यांनी सुनावलं

देशात सर्वाधिक लसीकरण महाराष्ट्रात झाले आहे. पण लशींचा पुरवठा कमी होत असल्याचे राजेशटोपे यांनी म्हटले होते.
Performance of Maharashtra govt in terms of vaccination is weak
Performance of Maharashtra govt in terms of vaccination is weak

नवी दिल्ली : महाराष्ट्रात कोरोना लशीचा तुटवडा असून केंद्र सरकारकडून कमी प्रमाणात पुरवठा होत असल्याचा दावा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केला होता. डोस नसल्याने नागरिकांना लसीकरण केंद्रातून परत जावे लागत असल्याचेही टोपे यांनी म्हटले होते. त्यावर केंद्रीय आरोग्य मंत्री डॅा. हर्षवर्धन यांनी महाराष्ट्र सरकारला चांगलंच सुनावलं आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

देशात सर्वाधिक लसीकरण महाराष्ट्रात झाले आहे. पण केंद्र सरकारकडून लशींचा पुरवठा कमी प्रमाणात होत असल्याचे टोपे यांनी म्हटले होते. प्रत्येक आठवड्याला 14 लाख डोसची केंद्राकडे मागणी केल्याचेही त्यांनी सांगितले होते. यावर नाराजी व्यक्त करत हर्षवर्धन म्हणाले, काही राज्यांना कोरोनाला रोखण्यात अपयश आले आहे. त्यांचे प्रयत्न निंदाजनक आहेत. लोकांचे यापासून लक्ष विचलित करण्यासाठी तसेच लोकांनामध्ये भिती निर्माण करण्यासाठी ते अशी वक्तव्य करत आहेत.

आरोग्य सेवेतील व फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना लस देण्यामध्ये महाराष्ट्राची कामगिरी चांगली नाही. राज्य सरकार लोकांना धोक्यामध्ये घालत आहे. लशींच्या तुटवड्याचा आरोप तथ्यहीन आहे. आरोग्यमंत्री म्हणून मला मागील वर्षभर महाराष्ट्र सरकारचा कोरोनाविषयीचे नियोजन अत्यंत ढिसाळ दिसून आले आहे. त्यामुळे कोरोनाच्या लढाईत देशही मागे पडत असल्याची टीका हर्षवर्धन यांनी केली आहे.

प्रकाश जावडेकर यांनीही ट्विट करून महाराष्ट्राला मिळालेल्या डोसची माहिती दिली. ठाकरे सरकारने यामध्ये राजकारण करू नये. महाराष्ट्राला आतापर्यंत 1 कोटी 6 सहा डोस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामध्ये सरकारने 90 लाख डोसचा वापर केला आहे, असे जावडेकर यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, राज्यात अद्याप सुमारे 16 लाख डोस शिल्लक आहेत. केंद्र सरकारकडून अतिरिक्त 7 लाख डोस महाराष्ट्राला पाठविण्यात आले आहेत. 

दरम्यान, देशात कोरोना लसीकरणामध्ये महाराष्ट्र राज्य आघाडीवर असले तरी केंद्र सरकारकडून लशींचा अपेक्षित पुरवठा होत नसल्याची स्थिती आहे. लस नसल्याने नागरिकांना लसीकरण केंद्रावरून परत जावे लागत असल्याची कबुली खुद्द आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दर आठवड्याला किमान 40 लाख डोसची केंद्राकडे मागणी केल्याचेही टोपे यांनी सांगितले.

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com